शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

जीबगाव सिंचन योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 00:43 IST

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

सावली : सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही योजना तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंदावस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन सिंचनापासून अचानक वंचित झाली आहे. सिंचनाअभावी शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.वैनगंगा नदीच्या काठावरील देवटोक देवस्थानाजवळ जीबगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाला १९७८ मध्ये सुरुवात होऊन १९८२ मध्ये योजना पूर्णत्वास आली. त्यानंतर तालुक्यातील जीबगाव, पेठगाव माल, सिर्सी यासह अन्य गावातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून दोनदा पिके घेत होते. पाण्याच्या सुविधेने भरघोस पिके येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारायला लागले.परंतु, काही दिवसातच या योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फडणवीस यांनी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून योजनेच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळेच योजनेत वारंवार बिघाड येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. योजनेतील बिघाडामुळे शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहून शेती करावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशातही हाती आलेल्या धानाला भाव नससल्याने कर्ज कसे फेडायचे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतपिकातून हाती आलेल्या पैशातून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा की कर्जाचे हप्ते फेडायचे, अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)