शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जीबगाव सिंचन योजना बंद

By admin | Updated: February 19, 2015 00:43 IST

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

सावली : सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून जिबगाव सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही योजना तांत्रिक अडचणीत सापडल्याने बंदावस्थेत आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमीन सिंचनापासून अचानक वंचित झाली आहे. सिंचनाअभावी शेतपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे.वैनगंगा नदीच्या काठावरील देवटोक देवस्थानाजवळ जीबगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाला १९७८ मध्ये सुरुवात होऊन १९८२ मध्ये योजना पूर्णत्वास आली. त्यानंतर तालुक्यातील जीबगाव, पेठगाव माल, सिर्सी यासह अन्य गावातील सुमारे ८०० हेक्टर शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे येथील शेतकरी वर्षातून दोनदा पिके घेत होते. पाण्याच्या सुविधेने भरघोस पिके येत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारायला लागले.परंतु, काही दिवसातच या योजनेत तांत्रिक बिघाड आल्याने शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी शोभाताई फडणवीस यांची भेट घेऊन योजनेच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आमदार फडणवीस यांनी तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येऊनही संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून योजनेच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यामुळेच योजनेत वारंवार बिघाड येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. योजनेतील बिघाडामुळे शेतीचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहून शेती करावी लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेतकऱ्यांच्या हातचे पीक जात आहे. अशातही हाती आलेल्या धानाला भाव नससल्याने कर्ज कसे फेडायचे, अशा विवंचनेत शेतकरी सापडला आहे. बँकांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याने शेतपिकातून हाती आलेल्या पैशातून आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा की कर्जाचे हप्ते फेडायचे, अशा चिंतेत शेतकरी सापडला आहे. (तालुका प्रतिनिधी)