शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

जलनगर बनले समस्यांचे माहेर घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:38 IST

शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे.

मूलभूत सुविधांचा अभाव: संघर्ष समितीचे जिल्हाधिकारी , पालकमंत्र्यांना निवेदनचंद्रपूर : शहरातील जटपुरागेट प्रभागांतर्गत येणारे जलनगर वॉर्ड सध्या समस्यांचे मोहरघर बनले आहे. नाव जलनगर असले तरीही येथे पाण्याची भीषण समस्या आहे. यासोबतच अन्य आवश्यक सुविधांचाही येथे मोठा अभाव आहे. या समस्या तत्काळ मार्गी लावण्याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.जलनगर वॉर्ड मागील ४० वर्षापासून उपेक्षित राहिलेला आहे. या वॉर्डातील नागरिकांमधील बहुतांशी नागरिक हे दोरिद्र्यरेषेच्या अंतर्गत येतात. मात्र त्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येते. या वॉर्डात पाण्याची सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही मनपा प्रशासनाची आहे. यासोबतच सांडपाणी नियोजन, कचरा संकलन, मलनिस्सारण या बाबींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फूटलेली आहे. यामुळे पाण्याची गळती होऊन प्रदूषित पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते. तसेच घनकचरा नियोजनही थंडबस्त्यात आहे. परिसरात हा कचरा टाकला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक घरात मलेरिया, टायफाईड, डेंग्यू, चिकूनगुण्या असे आजार पसरत आहेत. ही समस्या गंभीर असून, महापालिका प्रशासन तसेच संबंधीत लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याकरिता जलनगर नागरिक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आशुतोष सलील आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले आहे.शिष्टमंडळामध्ये समितीचे अध्यक्ष रवींद्र छबू वैरागडे, विनोद घाटे, मंगेश बेले, चंद्रकांत बोरीकर, अमित वैरागडे, दिलीप घाटे, कल्पना शिंदे, अर्चना ईटनकर, मीना लाखंडे, वर्षा बनकर, सारिका चौधरी, हर्षा साठोणे, रुक्साना शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)