शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर रस्त्याचे काम बंद पाडले !

By admin | Updated: March 30, 2016 01:23 IST

अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.

अंदाजपत्रकाप्रमाणे काम नाही : नागरिक उतरले रस्त्यावरसास्ती: अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी जैतापूर-भोयगाव रस्त्याचे काम मंगळवारी बंद पाडले.राजुरा, कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर, किन्होबोडी, मारडा, कुर्ली, भोयगाव, पेल्लोरा, नवेगाव, निमणी या दुर्गम भागाचा फायदा कंत्राटदारांनी आजवर घेतल्याचे दिसून येत आहे. कधी अवैध उत्खनन करुन तर कधी, अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता मनाला वाटेल त्या पद्धतीने काम करणे, असे कंत्राटदारांचे समिकरण आहे. जैतापूर भोयगाव हा परिसर तालुक्याच्या ठिकाणाहून ५० किमी अंतरावर येत असल्याने या ठिकाणापर्यंत कधीच मोठे अधिकारी येत नसल्याने कंत्राटदार तलाठ्यासोबत आर्थिक व्यवहार करुन काम करीत आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग गडचांदूर अंतर्गत जैतापूर ते भोयगाव या २.५ किमी अंतराचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम मंजूर झाले. कंत्राटदारांनी अंदाजपत्रकाप्रमाणे गावाजवळील काम केले. परंतु अर्धे काम झाल्यानंतर मनमर्जीने काम सुरु केले. यात रवाळीचा व मुरुमाचा डबल थर असताना त्यांनी एकाच थरावर डांबर टाकणे सुरु केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर अभियंत्यासोबत बोलणे करुन संबंधित कंत्राटदाराचे काम बंद पाडले.गावकऱ्यांच्या चातुर्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे झाले. आधीच विकास कामाच्या बाबतीत दुर्लक्षित गाव. गावाबाहेर जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर रस्त्याचे काम आले आणि तेही निकृष्ठ दर्जाचे. यामुळे गावकऱ्यांच्या मनात प्रशासनाबद्दल रोष दिसून येत आहे.नुकतीच याच ठिकाणाहून जागृत युवकांनी आपले सरकार या सरकारच्या आॅनलाईन संकेतस्थळावर नांदगाव- जैतापूर रस्त्याच्या कामाची तक्रार केली असता प्रशासनाने त्या तक्रारीची दखल घेऊन पुणे येथील चौकशी समितीला जैतापुरात येऊन कामाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदाराला अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण करुन देण्याचे आदेश दिले. ही घटना ताजी असताना पुन्हा त्याच गावात अशाप्रकारची हिंमत कंत्राटदाराकडून करणे म्हणजे ढिसाळ प्रशासनाच्या कार्यप्रणालीचे उदाहरण आहे, असे समजल्यास वावगे ठरणार नाही.या परिसरात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. येथील प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा वचक नसल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालत आहे. हा संपूर्ण कारभार अर्थपूर्ण सुरु असल्यामुळे कंत्राटदारसुद्धा आपल्या बुद्धीला सुचेल त्याप्रमाणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे.