शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
3
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
6
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
7
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
8
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
9
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
10
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
11
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
13
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
14
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
15
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
16
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
17
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
18
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
19
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
20
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा

जैन समाजाने अल्पसंख्याक योजनांचा लाभ घेऊन प्रगती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:29 IST

चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व ...

चंद्रपूर : भारतातील जैन समाजाला २०१४मध्ये अल्पसंख्याक दर्जा मिळाला. भारतीय संविधानातील तरतुदीमुळे मिळालेली ही ओळख आपला धर्म, इतिहास व परंपरांची अस्मिता कायम ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षण, उद्योग, व्यवसाय व सामाजिक उत्कर्षासाठी अल्पसंख्याक याेजनांचा लाभ घेऊन जैन समाजाने प्रगती करावी, असे आवाहन ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सराफा लाईनमधील जैन मंदिरात बुधवारी आयोजित जागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनचे महामंत्री संदीप भंडारी, विनय, सकल जैन समाजाचे उपाध्यक्ष योगेश गांधी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष गांधी म्हणाले, जैन समाज हा सर्वाधिक कर देणारा व उच्चशिक्षित समाज आहे. दानधर्म करण्यातही पुढे आहे. उद्योग-व्यवसायात अग्रेसर असला तरी देशभरात जैन समाजातील सुमारे ३० टक्के घटक आजही गरिबीत जीवन कंठत आहेत. त्यामुळे समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक योजनांचा उपयोग केला पाहिजे. मात्र, योजनांच्या माहितीपासून जैन समाज अनभिज्ञ आहे. यासाठीच ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याचे गांधी यांनी सांगितले. सम्राट अशोकाच्या काळात या देशात ४० जैन समाज होता, असा इतिहास सांगतो. परंतु, आपण स्वत:पासूनच दूर जात असल्याने जैन समाज आज असंघटीत आहे, अशी खंतही गांधी यांनी व्यक्त केली. शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन समाजाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी २२ राज्यांमध्ये ऑल इंडिया जैन मायनाॅरिटी फेडरेशनच्या ६५० शाखा कार्यरत आहेत. समाजातील विधवा महिलांना दरमहा ५ हजारांची मदत केली जाते, असेही गांधी यांनी सांगितले. योगेश भंडारी यांनी अल्पसंख्याक संकल्पनेचे महत्त्व सांगून योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र लोढा यांनी केले. यावेळी रवींद्र बैद्य, जितेंद्र चोरडिया, अमर गांधी, जितेंद्र मेहर, राज पुगलिया, निर्भय कटारिया, पेनबाबू भंडारी, जितेंद्र जोगड, यश मुनोत, महेंद्र मंडलेचा, राजेश डागा आदी जैन बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

- तर दरवर्षी मिळू शकतो ५०० कोटींचा निधी

केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने जैन समाजासाठी अल्पसंख्याक विभागाकडून सात वर्षांत ६३० कोटींचा निधी मिळू शकला. यातून जैन समाजात विविध उपक्रम राबवता आले. देशभरात जागृती झाली तर दरवर्षी ५०० कोटींचा निधी मिळू शकतो. त्यामुळे जैन समाजाने स्वत:पुरताच विचार न करता, देशभरातील गरीब जैन समाजाचाही विचार करावा, असे आवाहन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.