शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

इटियाडोह धरणाच्या पाण्यापासून अनेक गावे वंचित

By admin | Updated: November 29, 2014 23:18 IST

गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री

चंद्रपूर : गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह धरण हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण आहे. या धरणाचे पाणी बोंडगाव(देवी) परिसरातील २५ वर्षांपासून वंचित असलेल्या गावांना पुरविण्यात यावे, या मागणीसाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.इटियाडोह धरणाची पायाभरणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते झाली. पाणी पुरवठ्याची सुरूवात सन १९७२ ला करण्यात आली. धरणाच्या पाण्याखालील क्षेत्र ६३.५० दशलक्ष चौरस मिटर असून पाण्याची क्षमता ३८१.५८७ दशलक्ष घनमिटर आहे. या धरणाचे पाणी अर्जूनी (मोर) ते आरमोरी (गडचिरोली) असा ८० ते ९० किलोमिटरचा प्रवास करीत आरमोरीपर्यंत पाणी पुरवठा केला जातो. परंतु अर्जुनी (मोर) पासून ९ किलोमिटर अंतरावर असलेल्या बोंडगाव(देवी) परिसरातील २५ ते ३० खेडेगाव या धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत.या परिसरातील जनतेला प्राण्यांना, पशुपक्षांना, उन्हाळ्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई भासत असते. या परिसरातील पाणी टंचाईचा विचार करून शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे विदर्भ सल्लागार यशवंतराव उके यांच्या प्रमुख पुढाकाराने राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदन देवून समस्यांची जाणिव करून देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष संजय बुटले, जिल्हा संघटक अनिल डोंगरे, शहर उपाध्यक्ष संजय मुरस्कर, शहर संघटक कमलेश रामटेके, अरुण कांबळे, दीपक तांड्रा (घुग्घुस) आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)