शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

एसटी कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र असणे आता बंधनकारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 14:57 IST

प्रादेशिक व्यवस्थापकांच्या सूचना : कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर येताना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश कर्मचारी ओळखपत्र घालून येत नसल्याची बाब एसटी महामंडळाच्या लक्षात आली. एसटी महामंडळाच्या प्रदेश कार्यालयाने २५ एप्रिल रोजी पत्र काढले आहे. त्यात प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर असताना गळ्यात दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे बंधनकारक केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

विविध प्रशासकीय कामांसाठी नागरिक, प्रवासी, विद्यार्थी एसटीच्या कार्यालयात जातात. विशेष करून विभागीय व प्रदेश कार्यालयात मोठ्या प्रमाणात कर्मचारी असतात. एसटी चालक व वाहकाला गणवेश असतो, तसेच गणवेशावर असलेल्या नावाच्या पट्टीवरून त्याची ओळख पटत असते. मात्र, कार्यालयातील प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना गणवेश नाही. इतर कार्यालयांच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे, याची आठवण २५ एप्रिलच्या पत्रातून करून देण्यात आली आहे. 

ओळखपत्रासाठी कर्मचारी सांगतात असे बहाणेआयकार्ड घरीच राहिले, आयकार्डची लेस तुटली आहे, आयकार्ड पॅन्टच्या खिशात ठेवले आहे. असे बहाणे कर्मचारी सांगतात. आयकार्ड घालूनच प्रत्येक कर्मचाऱ्याने कर्तव्यावर उपस्थित असणे आता मात्र बंधनकारक करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्याने ओळखपत्र घालणे हा कार्यालयीन शिस्तीचा भाग आहे. मात्र, ओळखपत्र घातले जात नसल्याने कार्यालयाची शिस्त आणि नियम तोडले जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

कारवाई होणारप्रत्येक एसटी कर्मचाऱ्याने दर्शनी भागावर ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. ओळखपत्र न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

तक्रारीनंतर ओळखपत्र बंधनकारकएसटी महामंडळातील कर्मचारी, अधिकारी ओळखपत्र लावत नसल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने प्रदेश कार्यालयात केली. या तक्रारीची दखल घेत सर्व विभागीय कार्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार एसटी कर्मचाऱ्याने ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विभाग नियंत्रकांना आले पत्रप्रत्येक कर्मचाऱ्याने कार्यालयात ओळखपत्र घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रादेशिक कार्यालयाद्वारे सर्व विभाग नियंत्रकांना पत्र पाठविण्यात आले आहे. यानंतर विभागीय नियंत्रकांनी सर्व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र घालून येणे बंधनकारक केले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर