शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

मात्र प्रत्येक वेळी लाॅकडाऊन करणे शक्य नाही. आता लसीकरण हा पर्याय शोधण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर ...

मात्र प्रत्येक वेळी लाॅकडाऊन करणे शक्य नाही. आता लसीकरण हा पर्याय शोधण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. मात्र काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. घाईगडबड करून ते घरी जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. असे न केल्यास जीवावरही बेतू शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास बसा, त्यानंतरच घरी जा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. अनेकांचा यामुळे जीव गेला. मागील वर्षापासून आतापर्यंत तब्बल ८४ हजार ५५२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ८२ हजार २९५ नागरिकांनी यावर मात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासन तसेच प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, लसीकरण हा पर्याय सध्या प्रभावी ठरत आहे. प्रथम फ्रंट वर्कर त्यानंतर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. दरम्यान, शासनाने अधिक व्याप्ती वाढवत १८ वर्षांवरील प्रत्येकांना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर लसीकरण सुरूही केले. मात्र लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. दरम्यान, आता ३० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

लस घेतल्यानंतर प्रत्येकांना केंद्रामध्ये अर्धा तास थांबण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र काही अतिउत्साही नागरिक लसीकरण झाल्याबरोबर केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. लस घेतल्यानंतर शरीर लसीला साथ देते की नाही, कुणाला ॲलर्जी होते का हे तपासण्यासाठी केंद्रात अर्धा तास थांबणे गरजेचे असते. मात्र काही जण घरी जाण्याची घाई करतात. आरोग्य विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही घाई जीवावर बेतू शकते. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास थांबा. यात आपलीच भलाई आहे.

बाॅक्स

आतापर्यंत झालेले लसीकरण-एकूण लसीकरण-

पहिला डोस-

दुसरा डोस-

एकूण लसीकरण केंद्र-

बाॅक्स

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर अर्धा तासात काही दुष्परिणाम जाणवतात का, ॲलर्जी तसेच शरीरात काही बदल होतात का, चक्कर येते का आदी समजू शकते. काही दुष्परिणाम जाणवल्यास केंद्रावर तत्काळ औषधोपचार मिळू शकतो. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे केंद्रावर थांबण्याचा कंटाळा न करता प्रत्येकाने लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रात थांबून राहणे गरजेचे आहे.

बाॅक्स

लस हेच औषध

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस हेच सध्या तरी प्रभावी माध्यम आहे. लस घेतल्यामुळे कोरोना झाला तरी त्याचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे प्रत्येकांने न घाबरता लस घेतलीच पाहिजे. मात्र केंद्रावरून घरी जाण्याची घाई करू नये. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये राहावे. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. लसीकरण झाले तरी मास्क, सॅनिटायझर लावणे तसेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे.

कोट

प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई न करता अर्धा तास केंद्रात बसावे. ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली तरी प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत.

- निवृत्तीनाथ राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर