शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:19 IST

मात्र प्रत्येक वेळी लाॅकडाऊन करणे शक्य नाही. आता लसीकरण हा पर्याय शोधण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर ...

मात्र प्रत्येक वेळी लाॅकडाऊन करणे शक्य नाही. आता लसीकरण हा पर्याय शोधण्यात आला आहे. मात्र लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. मात्र काही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. घाईगडबड करून ते घरी जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. असे न केल्यास जीवावरही बेतू शकते. त्यामुळे लस घेतल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास बसा, त्यानंतरच घरी जा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेमध्ये दुसरी लाट अधिक धोकादायक ठरली. अनेकांचा यामुळे जीव गेला. मागील वर्षापासून आतापर्यंत तब्बल ८४ हजार ५५२ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. तर ८२ हजार २९५ नागरिकांनी यावर मात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासन तसेच प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, लसीकरण हा पर्याय सध्या प्रभावी ठरत आहे. प्रथम फ्रंट वर्कर त्यानंतर ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत होते. दरम्यान, शासनाने अधिक व्याप्ती वाढवत १८ वर्षांवरील प्रत्येकांना लस देण्याची घोषणा केली. त्यानंतर लसीकरण सुरूही केले. मात्र लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. दरम्यान, आता ३० वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात आली आहे.

लस घेतल्यानंतर प्रत्येकांना केंद्रामध्ये अर्धा तास थांबण्यासंदर्भात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र काही अतिउत्साही नागरिक लसीकरण झाल्याबरोबर केंद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. लस घेतल्यानंतर शरीर लसीला साथ देते की नाही, कुणाला ॲलर्जी होते का हे तपासण्यासाठी केंद्रात अर्धा तास थांबणे गरजेचे असते. मात्र काही जण घरी जाण्याची घाई करतात. आरोग्य विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही घाई जीवावर बेतू शकते. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये अर्धा तास थांबा. यात आपलीच भलाई आहे.

बाॅक्स

आतापर्यंत झालेले लसीकरण-एकूण लसीकरण-

पहिला डोस-

दुसरा डोस-

एकूण लसीकरण केंद्र-

बाॅक्स

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी?

लस घेतल्यानंतर अर्धा तासात काही दुष्परिणाम जाणवतात का, ॲलर्जी तसेच शरीरात काही बदल होतात का, चक्कर येते का आदी समजू शकते. काही दुष्परिणाम जाणवल्यास केंद्रावर तत्काळ औषधोपचार मिळू शकतो. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे लस घेतल्यानंतर अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे केंद्रावर थांबण्याचा कंटाळा न करता प्रत्येकाने लस घेतल्यानंतर अर्धा तास केंद्रात थांबून राहणे गरजेचे आहे.

बाॅक्स

लस हेच औषध

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस हेच सध्या तरी प्रभावी माध्यम आहे. लस घेतल्यामुळे कोरोना झाला तरी त्याचा प्रभाव कमी असतो. त्यामुळे प्रत्येकांने न घाबरता लस घेतलीच पाहिजे. मात्र केंद्रावरून घरी जाण्याची घाई करू नये. लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निगराणीमध्ये राहावे. कोरोनापासून दूर राहायचे असेल तर कोरोनाचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. लसीकरण झाले तरी मास्क, सॅनिटायझर लावणे तसेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे.

कोट

प्रत्येक लसीकरण केंद्रामध्ये नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई न करता अर्धा तास केंद्रात बसावे. ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली तरी प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळावेत.

- निवृत्तीनाथ राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर