शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

रेल्वे उड्डाण पुलाचा वाद मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:00 IST

येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.

ठळक मुद्देबांधकामाचा मार्ग मोकळा : बल्लारपुरातील समस्या सुटणार

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील वस्ती आणि डेपो भागाला रहदारीने जोडणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून नगरपरिषदेच्या सहकार्याने केले जात आहे. बरेचसे काम झाले आहे. मात्र, वस्ती भागाकडील पुलाचा उतरणारा भाग कसा असावा, याबाबत पुलाजवळी रहिवासी आणि इतर नागरिक यांच्यात वाद निर्माण झाला. त्यामुळे पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. अखेर, यावर दोन्ही बाजुंच्या लोकांशी झालेल्या निर्णायक चर्चेअंती पुलाच्या उतार भागाची बांधणी कशी असावी, यावर एकमत होऊन हा वाद संपुष्टात आला आहे.कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने नवीन आखणीचा नकाशा, त्याला येणारा खर्चास मंजूरी याकरिता बराच वेळ जाणार आहे. यामुळे, पुलाचे काम थोडे लांबणीवर पडले आहे. पण, या पुलाबाबत उफळलेला वाद एकदाचा मिटला. सुमारे ४० वर्षापूर्वी हा उड्डाण पूल तयार बांधण्यात आला. आता तो काहीसा जीर्ण झाला असल्याने रेल्वे विभागाने नगर परिषदेची मदत घेऊन पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. पुलाचा वस्तीकडील उतार भाग तोडून तो पूर्वीसारखाच ठेवण्याचे ठरले होते. परंतु, उतार भागाजवळ असलेल्या रहिवाशांनी आता पुलाचा उतार भाग आमच्या घरांपुढे नको, घरापुढील जागा मोकळी हवी, त्यामुळे तो निमुळता घ्या, असे म्हणत काही भागात पायºया कराव्यात, अशी मागणी करुन या पुलाचे काम बंद पाडले.अखेर, नगर परिषद प्रशासनाने दोन्ही बाजूच्या लोकांना, लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा घडवून आणली आणि पूल बांधणीचा सूवर्णमध्य समोर आणून चर्चेअंती त्याला मंजुरी दिली. त्यामुळे अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर मिटला. पुलाचे उर्वरीत काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सभेला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, उपाध्यक्ष मीना चौधरी, रेल्वे विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.