शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

बल्लारशाह महाराष्ट्रात मग गोंदिया नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर :  दीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर सुरू केली आहे. बल्लारशाह येथून या पॅसेंजरसाठी तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना चांदाफोर्टला जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गोंदिया पॅसेंजरला बल्लारशाहकडे येण्यास आणि बल्लारशाहमधून प्रवाशांना तिकीट देण्यास मध्य रेल्वे विभागाचा काय आक्षेप आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही काय, असा थेट प्रश्न झेडआरयूसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी उपस्थित केला असून त्यांनी मध्य रेल्वेसह केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधीला निवेदन पाठविले आहे.गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन बल्लारशाह ट्रेन पाठवण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तयार आहे, मग मध्य रेल्वे विभागाला यावर आक्षेप का, असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोरोनाचा धोका लक्षात घेता अनारक्षित तिकिटे देण्यास मनाई करण्यात आल्याचे उत्तर मिळाल्याचेही सुंचूवार यांनी म्हटले आहे. गोंदिया पॅसेंजर चालविण्यासाठी परवानगी आहे. मग केवळ बल्लारशाहपर्यंत ट्रेन आणण्यास काय हरकत आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बल्लारपूरपर्यंत ही ट्रेन सुरु करण्याची मागणी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अनारक्षित तिकिटे देत आहे. मग मध्य रेल्वेला काय समस्या आहे. एका मंडळासाठी एक नियम आणि दुसऱ्या मंडळासाठी दुसरा? रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही ट्रेन बल्लारशाहपर्यंत चालवावी आणि बल्लारशाहमधूनही प्रवाशांना तिकिटे द्यावीत. बल्लारशाह महाराष्ट्रात आहे तर गोंदिया महाराष्ट्रात नाही का? -श्रीनिवास सुंचूवार,  झेडआरयूसी सदस्य, मध्य रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे