शहरं
Join us  
Trending Stories
1
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
2
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
3
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
4
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
5
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
6
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
7
कृतिशील, निर्मितीशील असणे हेच जीवनाचे इतिवृत्त - तारा भवाळकर
8
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
9
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
10
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
11
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
12
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
13
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
14
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
15
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
16
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
17
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
18
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
19
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
20
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारशाह महाराष्ट्रात मग गोंदिया नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2021 05:00 IST

गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर :  दीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने गोंदिया-बल्लारशाह पॅसेंजर सुरू केली आहे. बल्लारशाह येथून या पॅसेंजरसाठी तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना चांदाफोर्टला जाऊन ट्रेन पकडावी लागत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. गोंदिया पॅसेंजरला बल्लारशाहकडे येण्यास आणि बल्लारशाहमधून प्रवाशांना तिकीट देण्यास मध्य रेल्वे विभागाचा काय आक्षेप आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही काय, असा थेट प्रश्न झेडआरयूसी सदस्य श्रीनिवास सुंचूवार यांनी उपस्थित केला असून त्यांनी मध्य रेल्वेसह केंद्र, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधीला निवेदन पाठविले आहे.गोंदिया- बल्लारशाह ही पॅसेंजर सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी ट्रेन बल्लारशाहला पोहोचली. बल्लारशाहमधून परतताना  ३१ प्रवाशांना तिकिटे देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी तिकीट अचानक बंद करण्यात आले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. आता ही ट्रेन बल्लारशाह रेल्वे स्थानकावर येण्याऐवजी चांदाफोर्टपर्यंत येत आहे. चांदाफोर्ट ते बल्लारशाह दरम्यानच्या १५  किमी अंतरासाठी, प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोन बल्लारशाह ट्रेन पाठवण्यासाठी आणि प्रवाशांना तिकीट देण्यासाठी तयार आहे, मग मध्य रेल्वे विभागाला यावर आक्षेप का, असा प्रश्न उपस्थिती केला जात आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारले असता महाराष्ट्र सरकारच्या वतीने कोरोनाचा धोका लक्षात घेता अनारक्षित तिकिटे देण्यास मनाई करण्यात आल्याचे उत्तर मिळाल्याचेही सुंचूवार यांनी म्हटले आहे. गोंदिया पॅसेंजर चालविण्यासाठी परवानगी आहे. मग केवळ बल्लारशाहपर्यंत ट्रेन आणण्यास काय हरकत आहे. बल्लारशाह महाराष्ट्रात नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बल्लारपूरपर्यंत ही ट्रेन सुरु करण्याची मागणी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अनारक्षित तिकिटे देत आहे. मग मध्य रेल्वेला काय समस्या आहे. एका मंडळासाठी एक नियम आणि दुसऱ्या मंडळासाठी दुसरा? रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता ही ट्रेन बल्लारशाहपर्यंत चालवावी आणि बल्लारशाहमधूनही प्रवाशांना तिकिटे द्यावीत. बल्लारशाह महाराष्ट्रात आहे तर गोंदिया महाराष्ट्रात नाही का? -श्रीनिवास सुंचूवार,  झेडआरयूसी सदस्य, मध्य रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे