शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:43 IST

Chandrapur : जिल्ह्याभरात जवळपास शेकडो थंड पाण्याची जार देण्याचे प्रकल्प असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्नकार्य तसेच विविध सोहळ्यांमध्ये जारच्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अवघ्या ३० रुपयांत २० लिटर स्वस्त आणि थंड पाणी मिळत असल्याने जारचे पाणी खरेदीकडे यजमानांचा कल असतो. मात्र, या पाण्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हे जारचे पाणी आजार तर देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता घरगुती छोटा-मोठा कार्यक्रम असो किंवा शासकीय वा खासगी कार्यालयातसुद्धा जारच्याच पाण्याचा वापर केला जातो. अनेकजण तर घरीपण दररोज कॅनचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. त्यामुळे शहरापासून ते गावखेड्यापासून जारच्या पाण्याची दुकाने दिसून येतात. वास्तविक, पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी थंड करण्याच्या मशीनमध्ये थंड केल्यानंतर जारमध्ये भरले जाते. परंतु, बरेचदा जारची नीट स्वच्छता केली जात नाही. महिनोन्महिने त्याच जारमध्ये पाणी भरले जाते. कुठे-कुठे तर पाणी थंड करण्यासाठी इथिलिन ग्लायकॉल नावाचा घातक द्रव पदार्थ टाकून पाणी थंड करण्याची प्रक्रिया करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून, किडनी तसेच हृदयावर गंभीर स्वरूपाचा परिणाम करणार आहे. 

२० ते ३० रुपयांत जारचे पाणीमोठ्या शहरापासून गावखेड्यातही जारच्या पाण्याचे प्रोजेक्ट आहेत. २० ते ३० रुपयाला एक जार विक्री केली जाते.

कारवाईअभावी जार संचालक बेपर्वाथंड पाण्याची जार वितरित करण्याची पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणी तपासणी करत नाही वा कारवाई करत नाही. त्यामुळे हे पाणी वितरित करणारे बेपर्वा झाले असून शुद्धतेकडे दुर्लक्ष करत पाण्याचा पुरवठा करतात.

पाण्याच्या शुद्धतेची जबाबदारी कोणाची ?पाणी वितरण करणारे शुद्ध व थंडगार पाणी वितरित करण्याचा दावा करत असतात. मात्र त्याच्या शुद्धतेबाबत कुणीच काही विचारणा करत नसल्याने जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होतो.

तपासणी कोण करतो?पाणी शुद्ध आहे की नाही, याबाबतची तपासणी करणे गरजेचे असताना कन्हैया यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater pollutionजल प्रदूषण