शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जारचे पाणी आजार तर देत नाही ना? नागरिकांनो पाण्याच्या शुद्धतेबाबत घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:43 IST

Chandrapur : जिल्ह्याभरात जवळपास शेकडो थंड पाण्याची जार देण्याचे प्रकल्प असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लग्नकार्य तसेच विविध सोहळ्यांमध्ये जारच्या पाण्याचा सर्वाधिक वापर केला जातो. अवघ्या ३० रुपयांत २० लिटर स्वस्त आणि थंड पाणी मिळत असल्याने जारचे पाणी खरेदीकडे यजमानांचा कल असतो. मात्र, या पाण्याच्या दर्जाबाबत ग्राहकांकडून फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हे जारचे पाणी आजार तर देत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता घरगुती छोटा-मोठा कार्यक्रम असो किंवा शासकीय वा खासगी कार्यालयातसुद्धा जारच्याच पाण्याचा वापर केला जातो. अनेकजण तर घरीपण दररोज कॅनचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी करतात. त्यामुळे शहरापासून ते गावखेड्यापासून जारच्या पाण्याची दुकाने दिसून येतात. वास्तविक, पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी थंड करण्याच्या मशीनमध्ये थंड केल्यानंतर जारमध्ये भरले जाते. परंतु, बरेचदा जारची नीट स्वच्छता केली जात नाही. महिनोन्महिने त्याच जारमध्ये पाणी भरले जाते. कुठे-कुठे तर पाणी थंड करण्यासाठी इथिलिन ग्लायकॉल नावाचा घातक द्रव पदार्थ टाकून पाणी थंड करण्याची प्रक्रिया करीत आहेत. हा संपूर्ण प्रकार नागरिकांच्या जीविताशी खेळणारा असून, किडनी तसेच हृदयावर गंभीर स्वरूपाचा परिणाम करणार आहे. 

२० ते ३० रुपयांत जारचे पाणीमोठ्या शहरापासून गावखेड्यातही जारच्या पाण्याचे प्रोजेक्ट आहेत. २० ते ३० रुपयाला एक जार विक्री केली जाते.

कारवाईअभावी जार संचालक बेपर्वाथंड पाण्याची जार वितरित करण्याची पाण्याच्या शुद्धतेबाबत कुणी तपासणी करत नाही वा कारवाई करत नाही. त्यामुळे हे पाणी वितरित करणारे बेपर्वा झाले असून शुद्धतेकडे दुर्लक्ष करत पाण्याचा पुरवठा करतात.

पाण्याच्या शुद्धतेची जबाबदारी कोणाची ?पाणी वितरण करणारे शुद्ध व थंडगार पाणी वितरित करण्याचा दावा करत असतात. मात्र त्याच्या शुद्धतेबाबत कुणीच काही विचारणा करत नसल्याने जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होतो.

तपासणी कोण करतो?पाणी शुद्ध आहे की नाही, याबाबतची तपासणी करणे गरजेचे असताना कन्हैया यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरwater pollutionजल प्रदूषण