शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

हा पर्यायी मार्ग आहे की नरकातून जाणारा मार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 17:09 IST

नाल्यातून तयार केला पर्यायी मार्ग: अंडरपास पुलाच्या कासवगती कामाने गाव विभागले दोन भागात

सुभाष भटवलकरलोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या विसापूर गावात मध्य रेल्वेच्या बल्लारशाह वर्धा प्रस्तावित चौथ्या रेल्वे लाइनच्या विस्तारीकरणामुळे अंडरपास पुलाचे वाढीव बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सदर विसापूर बल्लारपूर रोड हा ४१ क्रमांकाचा एमडीआर बंद आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूरची परवानगी किंवा त्यांना अवगतसुद्धा करण्यात आले नाही आणि पर्यायी मार्ग रेल्वे विभागाने दिला. मात्र, तो मार्ग त्या विभागाचा नसून नाला आहे.

त्यामधून पावसाळ्यात वाहन टाकताना गावकऱ्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत आणि अंडरपास पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु असल्याने गाव मागील दोन महिन्यांपासून दोन भागात विभागले असून एकमेकांशी संपर्क व इतर गरजेची कामे करण्यासाठी गावकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

बल्लारपूर तालुक्यातील सर्वांत मोठे १७ हजार लोकसंख्या असलेले गाव चौथ्या रेल्वे लाइनच्या संथगतीच्या कामामुळे दोन भागात विभागले गेले आहे. एकमेव अंडरपासमधून जाणाऱ्या एमडीआर ४१ क्रमांकाचा मार्गामुळे नागरिकांचे आवागमन होत होते. रेल्वे विभागाने रस्ता बंद करताना संबंधित विभागाची परवानगी न घेता व पर्यायी मार्गाची ठोस तजवीज न करता नाल्यामधून रस्ता काढला. तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा नसून नाला आहे. या नाल्यामधून गावकऱ्यांना जाण्यास मध्य रेल्वेने गावकऱ्यांना भाग पाडले आहे. यामुळे त्यांना भर पावसाळ्यात जणू काही नरक यातना भोगत त्यामधून जावे लागत आहे.

गावाची लोकसंख्या व रेल्वे ट्राफीक बघता अनेक वर्षांपासून येथे पादचारी पुलाची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. परंतु, यावर रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे आणि मागील दोन महिन्यापासून अंडरपास पूल मार्ग चौथ्या रेल्वेच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अस्थायी स्वरुपात बंद केला आहे. कासवगतीच्या कामामुळे तो अनिश्चित काळासाठी बंदच राहणार आहे. यावर लवकर पर्याय काढावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे

रेल्वे विभागाची इतर विभागांसोबत संयुक्त बैठकझेडआरयुसीसी रेल्वे सदस्य अजय दुबे आणि संदीप पोढे यांनी विसापूरमध्ये अंडरपास रस्ता बंद असल्याची पाहणी करून थर्ड लाइन कॅन्स्ट्रक्शन इंजिनिअर रेल्वे प्रशासन नवीन शर्मा यांना समस्येबाबत अवगत केले. सोबत उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांच्याशी भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. त्यांनी विसापूर ग्रामपंचायत, रेल्वे प्रशासन व थर्ड लाइन कन्स्ट्रक्शन इंजिनिअर अशी संयुक्त बैठक सोमवारी लावून यावर उपाययोजना करू, असे आश्वासन दिले.

"रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर यांच्याशी याबाबत कोणताच पत्र व्यवहार केला नाही. उपविभागीय अधिकारी, बल्लारपूर यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी एक महिन्याच्या आत अंडरपास पुलाचे बांधकाम करून स्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु, त्यांनी अद्याप सदर रस्ता मोकळा केला नाही व पर्यायी मार्ग दिला. तो रस्ता आमच्या विभागाचा नसून, याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार करून रस्ता मोकळा करण्यास बाध्य करू."-वैभव जोशी, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बल्लारपूर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकchandrapur-acचंद्रपूर