शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

‘जलयुक्त’ने वाढणार सिंचन व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:51 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे.

ठळक मुद्देयंदा ९ हजार ६४५ हजार कामे पूर्ण : खरीप हंगामात होणार विविध पिकांना लाभ

राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे. परंतु, २०१८-१९ वर्षातील १२ हजार ४५३ कामांची उद्दिष्ट्यपूर्ती प्रशासनाला करता आली नाही. ९ हजार ६४५ कामेच पूर्ण होऊ शकली. १ हजार ४९५ कामे अर्धवट राहिली आहेत.डोंगरहळदीतील कामे सर्वोत्तमपोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी या गावातील जलयुक्त शिवार अभियानची कामे सर्वोत्तम झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या कौशल्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. परिणामी, नियोजनातील सर्वच कामे पूर्ण होऊ शकली. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर आणि वरोरा तालुक्यातील पाचगाव, राजुरा तालुक्यातील उमरझरा येथील कामेही प्रेरणादायी आहेत. यातून जलसाठा वाढला. शेकडो शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता अन्य पिकेही घेऊ लागले आहेत.जलयुक्त शिवारकामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड आदी कामे १५ तालुक्यात घेण्यात आली.जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने सरकारने विशेष लक्ष दिले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे कामे झपाट्याने पूर्ण झाली.- संजय गजपुरेसदस्य, जि. प. पार्डीजलयुक्त शिवार अभियानची कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली नाही. त्यामुळे या कामांमध्ये गुणवत्ता नाही. नियम बाजुला ठेवण्यात आले. कामांच्या जागा चुकीच्या निवडण्यात आल्या. असा प्रकार संपूर्ण जिल्ह्यातच घडल्याचे दिसून आले.-रोशन ढोक,सदस्य, पं. स. चिमूर