शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ने वाढणार सिंचन व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:51 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे.

ठळक मुद्देयंदा ९ हजार ६४५ हजार कामे पूर्ण : खरीप हंगामात होणार विविध पिकांना लाभ

राजेश मडावी। लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे. परंतु, २०१८-१९ वर्षातील १२ हजार ४५३ कामांची उद्दिष्ट्यपूर्ती प्रशासनाला करता आली नाही. ९ हजार ६४५ कामेच पूर्ण होऊ शकली. १ हजार ४९५ कामे अर्धवट राहिली आहेत.डोंगरहळदीतील कामे सर्वोत्तमपोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी या गावातील जलयुक्त शिवार अभियानची कामे सर्वोत्तम झाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांच्या कौशल्यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. परिणामी, नियोजनातील सर्वच कामे पूर्ण होऊ शकली. चंद्रपूर तालुक्यातील अजयपूर आणि वरोरा तालुक्यातील पाचगाव, राजुरा तालुक्यातील उमरझरा येथील कामेही प्रेरणादायी आहेत. यातून जलसाठा वाढला. शेकडो शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता अन्य पिकेही घेऊ लागले आहेत.जलयुक्त शिवारकामेजलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जूने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध, के.टी. वेअरदुरुस्ती व नुतनीकरण, जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे, नाले जोड आदी कामे १५ तालुक्यात घेण्यात आली.जलयुक्त शिवार अभियान २०१५-१६ पासून यशस्वीरित्या राबविल्या जात आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने सरकारने विशेष लक्ष दिले. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे कामे झपाट्याने पूर्ण झाली.- संजय गजपुरेसदस्य, जि. प. पार्डीजलयुक्त शिवार अभियानची कामे कंत्राटदारांकडून करून घेण्यात आली नाही. त्यामुळे या कामांमध्ये गुणवत्ता नाही. नियम बाजुला ठेवण्यात आले. कामांच्या जागा चुकीच्या निवडण्यात आल्या. असा प्रकार संपूर्ण जिल्ह्यातच घडल्याचे दिसून आले.-रोशन ढोक,सदस्य, पं. स. चिमूर