शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

कर्ज पुनर्गठणामध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप : भद्रावतीतील अनेक शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रवती : राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पुनर्गठणामध्ये अनियमितता झाली असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आयोजित बैठकीमध्ये करण्यात आली. दरम्यान, २५० शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी तहसीलदार महेश शितोडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, भाजपाचे महामंत्री नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती सभापती प्रविण ठेंगणे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, विविध गावातील शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक असे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा कथन केली. बँका पासबुक देत नाही, शेअर कपात चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.सहकारी क्षेत्राच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.अहवाल सादर करण्याचे आदेशतालुक्यातील नंदोरी, डोंगरगाव, टाकळी, विसलोन, चालबर्डी, वडाळा व अन्य गावामधील २०० ते २५० शेतकरी यावेळी उपस्थिती होते. संबंधित बाबींची योग्य ती चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी सेवा संस्था तथा बँकाच्या प्रतिनिधींना तहसीलदार शितोडे यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज