शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठणामध्ये अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप : भद्रावतीतील अनेक शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रवती : राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पुनर्गठणामध्ये अनियमितता झाली असून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आयोजित बैठकीमध्ये करण्यात आली. दरम्यान, २५० शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हताश होऊन घरी परतावे लागल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी तहसीलदार महेश शितोडे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, भाजपाचे महामंत्री नरेंद्र जिवतोडे, पंचायत समिती सभापती प्रविण ठेंगणे, जिल्हा परिषद सदस्य यशवंत वाघ, विविध गावातील शेतकऱ्यांचे प्रत्येकी एक असे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा कथन केली. बँका पासबुक देत नाही, शेअर कपात चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचेही सांगण्यात आले.सहकारी क्षेत्राच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करून शेतकºयांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.अहवाल सादर करण्याचे आदेशतालुक्यातील नंदोरी, डोंगरगाव, टाकळी, विसलोन, चालबर्डी, वडाळा व अन्य गावामधील २०० ते २५० शेतकरी यावेळी उपस्थिती होते. संबंधित बाबींची योग्य ती चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी सेवा संस्था तथा बँकाच्या प्रतिनिधींना तहसीलदार शितोडे यांनी दिले.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज