शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सिंदेवाहीतील पाणीपुरवठा अनियमित

By admin | Updated: November 9, 2016 01:56 IST

मागील काही महिन्यापासून सिंदेवाहतील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाण्याअभावी हाल : अनेक वॉर्डात नळाला पाणीच नाहीसिंदेवाही : मागील काही महिन्यापासून सिंदेवाहतील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा अनियमित असल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिंदेवाहीमध्ये २५ हजार लोकसंख्या असून पाण्याण्याच्या तीन टाक्या आहेत. उमा नदीला भरपूर पाणी आहे. पण सिंदेवाहीतील जनता मात्र तहानलेलीच असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सिंदेवाहीला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी पूर्वीच्या ग्राम पंचायतची व आता नगर पंचायतची आहे. काही दिवसांपासून नगरातील दोन- तीन वार्ड सोडले तर जवळपास सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. दसरा चौक, शिक्षक कॉलनी, मार्कण्डेय मंदिर, गणेश वॉर्ड, भारतमाता चौक, हनुमान मंदिर, शास्त्री चौक, राममंदिर परिसरातील वार्ड आदी भागात नळाद्वारे अतिशय कमी पाणीपुरवठा केला जात असल्याची नागरिकांची ओरड आहे. पाणीपुरवठा करणारे नगर पंचायत कर्मचारी पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरत नाहीत. तसेच राम मंदिर जवळील पाण्याची टाकी लिकेज असल्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित होत आहे. सिंदेवाही नगराला आंबोली व कळमगाव येथील उमा नदीवरुन पाणीपुरवठा होतो. मोटारपंप जळणे, विद्युत बिल न भरणे, पाईपलाईन फुटणे, जलशुद्धीकरण यंत्रामध्ये बिघाड झाला. अशा प्रकारे विविध कारणे नगर पंचायतमधून सांगितली जात आहेत. तसेच काही ठिकाणी पाईप लाईन जोडण्यात आली नाही. तर काही ठिकाणीे व्हॉल कमी-जास्त करण्यात आले आहे. कधी-कधी गावातील राजकारणाचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. हा चिंतेचा विषय बनला आहे. आठवड्यातून दोन- तीन दिवस येथील नळाला पाणी येत नाही. घरगुती नळाला पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी मुख्याधिकाऱ्याकडे करण्यात आल्या आहेत. परंतु नगर पंचायतचे कर्मचारी गावात पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरले आहेत. नगरात दररोज नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. (पालक प्रतिनिधी)