शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

ंदेवाडा खुर्द येथे अनियमित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 27, 2014 00:45 IST

देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

 देवाडा (खुर्द) : देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे. देवाडा खुर्द गावाला अंधारी नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याची भुजल पातळी खोलवर असल्याने एप्रिल महिन्यापासूनच हँडपंप व विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. गावात पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी नागरिक शेतशिवारात असलेल्या विहिरी व तलावातील पाणी बैलबंडीने आणून तहान भागवीत होते. त्यानंतर याठिकाणी होणार्‍या नेहमीच्या पाणी समस्येला वैतागून स्थानिक नेते मंडळींनी येथील पाणी समस्या दूर करण्यासाठी तत्कालीन मंत्री स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी पाण्याच्या टाकीला मंजुरी दिली. त्या अनुषंगाने २४ एप्रिल १९८९ मध्ये ७५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले.त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. आजमितीस या टाकीला १५ वर्षपूर्ण झाले आहे. ज्यावेळी पाण्याची टाकी अस्तित्वात आली त्यावेळी कनेक्शनधारक केवळ ५० ते ६० होते. परंतु हळूहळू वाढीव लोकसंख्येमुळे सदर कनेक्शनधारकांमध्ये वाढ होवून आज २६० कनेक्शनधारक झाले झाल्याने नागरिकांना पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागील दोन महिन्यापासून येथील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. याचा सर्वात जास्त फटका येथील वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना बसत आहे. याठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत असलेला गेट वॉल लिकेज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण पाणी उतार भागाकडे जात असल्याने वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना एक गुंडसुद्धा पाणी मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदाधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने सदर प्रकार घडत असल्याचा आरोप अनिल देऊरमल्ले यांच्यासह नागरिकांनी केला आहे. पदाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतातून काम करून आल्यानंतर दुपारी उन्हात महिलांना वनवन भटकून पाणी आणावे लागत आहे. नवीन योजने त्वरित सुरु करून गावात पाण्याची होणारी नेहमीची अनियमितता दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)