शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

ंदेवाडा खुर्द येथे अनियमित पाणीपुरवठा

By admin | Updated: May 27, 2014 00:45 IST

देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

 देवाडा (खुर्द) : देवाडा खुर्द गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून अनियमित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केली आहे. त्यामुळे गावात संतापाचे वातावरण आहे. देवाडा खुर्द गावाला अंधारी नदीच्या पात्रातून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी पाण्याची भुजल पातळी खोलवर असल्याने एप्रिल महिन्यापासूनच हँडपंप व विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. गावात पाणीपुरवठा योजना सुरु होण्यापूर्वी नागरिक शेतशिवारात असलेल्या विहिरी व तलावातील पाणी बैलबंडीने आणून तहान भागवीत होते. त्यानंतर याठिकाणी होणार्‍या नेहमीच्या पाणी समस्येला वैतागून स्थानिक नेते मंडळींनी येथील पाणी समस्या दूर करण्यासाठी तत्कालीन मंत्री स्वर्गीय वामनराव गड्डमवार यांच्याकडे समस्या मांडली. त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी पाण्याच्या टाकीला मंजुरी दिली. त्या अनुषंगाने २४ एप्रिल १९८९ मध्ये ७५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले.त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. आजमितीस या टाकीला १५ वर्षपूर्ण झाले आहे. ज्यावेळी पाण्याची टाकी अस्तित्वात आली त्यावेळी कनेक्शनधारक केवळ ५० ते ६० होते. परंतु हळूहळू वाढीव लोकसंख्येमुळे सदर कनेक्शनधारकांमध्ये वाढ होवून आज २६० कनेक्शनधारक झाले झाल्याने नागरिकांना पाण्याचा पुरवठा अल्प प्रमाणात होत आहे. त्यातच ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागील दोन महिन्यापासून येथील नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे. याचा सर्वात जास्त फटका येथील वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना बसत आहे. याठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येत असलेला गेट वॉल लिकेज असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे संपूर्ण पाणी उतार भागाकडे जात असल्याने वॉर्ड क्रमांक १ मधील नागरिकांना एक गुंडसुद्धा पाणी मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. संबंधित प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदाधिकार्‍यांचा कर्मचार्‍यांवर वचक नसल्याने सदर प्रकार घडत असल्याचा आरोप अनिल देऊरमल्ले यांच्यासह नागरिकांनी केला आहे. पदाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळेच गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतातून काम करून आल्यानंतर दुपारी उन्हात महिलांना वनवन भटकून पाणी आणावे लागत आहे. नवीन योजने त्वरित सुरु करून गावात पाण्याची होणारी नेहमीची अनियमितता दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)