शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित वीज पुरवठ्याने शेतीला मिळेना पाणी !

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने

ब्रह्मपुरी : शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी वीज डिपी जळणे यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीपाचा हंगाम फारसा समाधानकारक ठरला नाही. परंतु येणाऱ्या रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना आशा आहे. पण विद्युत पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे व भारनियमनांचे वेळापत्रक बदलविणे आवश्यक असल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या नशिबाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनचे राज्यात यंदा तब्बल दोन महिने उशीरा आगमन झाले. मात्र त्यानंतर परतीच्या पावसानेही हजेरी लावली नाही. परतीच्या पावसाने दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊसही हुलकावणी देऊन गेला. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम काही प्रमाणात हातातून निघून गेला. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने विहिरी, तळे आणि सिंचन तलावात साचलेल्या पाण्याच्या आधारे रबीचा हंगाम घेण्याकडे शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, रबीच्या नियोजनात आता वीज वितरण कंपनीने खोडा घातला आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अवाढव्य वीज बिल आकारले जात आहे. याचा भरणा नियमित होत नसल्याने कृषीपंपाला देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणता कपात करण्यात आली आहे. भारनियमनातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी आठ ते १० तास भारनियमन होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)