शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

अनियमित वीज पुरवठ्याने शेतीला मिळेना पाणी !

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने

ब्रह्मपुरी : शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी वीज डिपी जळणे यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीपाचा हंगाम फारसा समाधानकारक ठरला नाही. परंतु येणाऱ्या रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना आशा आहे. पण विद्युत पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे व भारनियमनांचे वेळापत्रक बदलविणे आवश्यक असल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या नशिबाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनचे राज्यात यंदा तब्बल दोन महिने उशीरा आगमन झाले. मात्र त्यानंतर परतीच्या पावसानेही हजेरी लावली नाही. परतीच्या पावसाने दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊसही हुलकावणी देऊन गेला. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम काही प्रमाणात हातातून निघून गेला. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने विहिरी, तळे आणि सिंचन तलावात साचलेल्या पाण्याच्या आधारे रबीचा हंगाम घेण्याकडे शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, रबीच्या नियोजनात आता वीज वितरण कंपनीने खोडा घातला आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अवाढव्य वीज बिल आकारले जात आहे. याचा भरणा नियमित होत नसल्याने कृषीपंपाला देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणता कपात करण्यात आली आहे. भारनियमनातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी आठ ते १० तास भारनियमन होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)