शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

अनियमित वीज पुरवठ्याने शेतीला मिळेना पाणी !

By admin | Updated: November 12, 2014 22:41 IST

शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने

ब्रह्मपुरी : शेतात विहीर असतानाही भारनियमन आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे. अनेकदा कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक ठिकाणी वीज डिपी जळणे यासारखे प्रकार घडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. खरीपाचा हंगाम फारसा समाधानकारक ठरला नाही. परंतु येणाऱ्या रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना आशा आहे. पण विद्युत पुरवठ्यामध्ये सुधारणा होणे व भारनियमनांचे वेळापत्रक बदलविणे आवश्यक असल्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.यावर्षी सुरुवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या नशिबाशी खेळ सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. जून महिन्यात येणाऱ्या मान्सूनचे राज्यात यंदा तब्बल दोन महिने उशीरा आगमन झाले. मात्र त्यानंतर परतीच्या पावसानेही हजेरी लावली नाही. परतीच्या पावसाने दिलासा मिळेल, असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊसही हुलकावणी देऊन गेला. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम काही प्रमाणात हातातून निघून गेला. दरम्यान सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने विहिरी, तळे आणि सिंचन तलावात साचलेल्या पाण्याच्या आधारे रबीचा हंगाम घेण्याकडे शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, रबीच्या नियोजनात आता वीज वितरण कंपनीने खोडा घातला आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अवाढव्य वीज बिल आकारले जात आहे. याचा भरणा नियमित होत नसल्याने कृषीपंपाला देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणता कपात करण्यात आली आहे. भारनियमनातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत काही ठिकाणी आठ ते १० तास भारनियमन होत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे. (तालुका प्रतिनिधी)