शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
5
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
6
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
7
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
8
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
9
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
10
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
11
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
12
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
13
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
14
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
15
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
16
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
17
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
18
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
19
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
20
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

चिमूर-वरोरा रस्ता अपघाताला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:13 IST

चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे.

ठळक मुद्देचौपदरी रस्त्याचे काम कासवगतीने : प्रवाशांना नाहक त्रास, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-उमरेड तसेच चिमूर-वरोरा या मुख्य रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या कामामध्ये चिमूर-वरोरा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवला असून पयार्यी रस्त्यावर माती टाकल्याने तसेच काळी गीट्टी अस्ताव्यस्त पसरवल्याने दुचाकी वाहनासाठी हा रस्ता मृत्युला निमंत्रण देत आहे. या रस्त्याचे बांधकाम त्वरित करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.चिमूर विधानसभा क्षेत्र सध्या राष्ट्रीय महामार्गावर आले आहे. त्यामुळे चिमूरला जोडणारे उमरेड - वरोरा या राष्ट्रीय महामागार्चे काम खासगी कंत्राटदाराकडुन सुरु आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने चिमूर-वरोरा हा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पयार्यी रस्ता तयार करण्यात आला असून या रस्तावर माती, मुरुम व काळी गिट्टी टाकण्यात आली आहे. मात्र या रस्त्यावर पाणी व रोलरने दबाई न केल्याने गिट्टी पुर्णत: उखडली असून सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. या गिट्टीमुळे दुचाकी वाहन धारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. उमरेड- चिमुर-वरोरा रस्त्याचे काम पूर्ण होण्यात आणखी बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.नियोजनाचा अभावचिमूर ते वरोरा या ५० किमी रस्त्याचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गात करून काम सुरू करण्यात आले. त्यानंतर हा पूर्ण रस्ताच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना तब्बल ५० किमीचा प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. हाच रस्ता थोडा-थोडा खोदून काम केले असते, तर वाहन धारकांना त्रास झाला नसता, अशी प्रतिक्रीया प्रवाशांमध्ये आहे.दोन युवकांचा बळीचिमूर-वरोरा चौपदरी रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू असले तरी कामाची गती अत्यंत धिमी आहे. मागील दोन महिन्यांपासुन काम बंद आहे. त्यात रस्त्यावर पुलासाठी खोदलेल्या खाड्यामुळे शेगाव व खामगाव येथील युवकांना अपघातात जीव गमवावा लागला.दुचाकी चालकाची कसरतया रस्त्यावर माती, मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे दुचाकीने प्रवास करताना गॉगल, स्कॉर्प असणे गरजेचे झाले आहे. अनेकवेळा दुचाकी स्लिप होऊन अपघातही घडले आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा