शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
4
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
5
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
6
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
7
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
8
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
9
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
10
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
11
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
12
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
13
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
14
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
15
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
16
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
17
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
18
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
19
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
20
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS

उन्हाच्या तीव्रतेने जिवती परिसरातील पिके करपली

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने

जिवती : माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके करपत असून यावर्षीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा तसा डोंगराळ व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. सिंचन क्षेत्रही तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे भवितव्य सर्वस्वी खरिपाच्या पेरणीवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या मध्यम हलक्या पावसाने खरीप हंगामाची सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी पूर्णत: खचला गेला. दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला शेतकरी पोळ्यानंतर समाधानकारक पावसामुळे सावरणार अशी आशा निर्माण झाली होती. सर्वत्र हिरवीगार पिके आणि जोमाने वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र वरुणराजाची अवकृपा झाली. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी बसला आहे. परंतु पावसाने चांगलीच दडी मारल्याने कडाक्याचा ऊन पडू लागला आहे. हिरवीगार असलेली पिके आठवडाभरातच करपत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आता हिरावला जात आहे. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी बँक, सावकारचे उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांने खर्च केला. महागाईच्या काळात बियाणे खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. समाधानकारक पिके येणार, अशी अपेक्षा घेवून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात करपलेली पिके अन् अश्रूच्या धारा दिसू लागल्या आहे.सध्या परिसरात विधानसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांची पीक परिस्थिती कशी आहे, हे विचारणारे कार्यकर्ते आता मतदान कुणाच्या बाजुने होणार, अशी समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहेत. निसर्गाच्या हुलकावणीने खरीप हंगाम धोक्यात आहे. महत्वाचा मानला जाणारा दिवाळी सण जवळ आला आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापसाच्या झाडाला बोंडे लागण्याआधीच डोळ्यादेखत कपाशी करपत आहे. खासगी सावकार, बकेचे कर्ज फेडायचे, आणि दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न आता पहाडावरील शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रोजगारासाठी अनेक जण स्थलांतर करण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)