शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

उन्हाच्या तीव्रतेने जिवती परिसरातील पिके करपली

By admin | Updated: September 29, 2014 00:42 IST

माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने

जिवती : माणिकगढ पहाडावरील जिवती तालुक्यात २० हजार ५१७ चौरस हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असून त्यात मुख्यत: कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर, मूग, उडीद असे पिके घेतली जाते. निसर्गाच्या पावसाने दिलेली हुलकावणी आणि कडक उन्हाच्या तडाख्यामुळे शेतातील उभी पिके करपत असून यावर्षीही शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिवती तालुका हा तसा डोंगराळ व खरीप हंगामाचा तालुका म्हणून ओळखला जातो. सिंचन क्षेत्रही तालुक्यात अगदी बोटावर मोजण्याइतके आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे भवितव्य सर्वस्वी खरिपाच्या पेरणीवर अवलंबून आहे. सुरुवातीच्या मध्यम हलक्या पावसाने खरीप हंगामाची सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी पूर्णत: खचला गेला. दुबार-तिबार पेरणी करण्याची वेळ आली. कर्जाच्या ओझ्याखाली सापडलेला शेतकरी पोळ्यानंतर समाधानकारक पावसामुळे सावरणार अशी आशा निर्माण झाली होती. सर्वत्र हिरवीगार पिके आणि जोमाने वाढ होत असल्याचे दिसत होते. मात्र वरुणराजाची अवकृपा झाली. पाऊस आज पडेल, उद्या पडेल या आशेवर शेतकरी बसला आहे. परंतु पावसाने चांगलीच दडी मारल्याने कडाक्याचा ऊन पडू लागला आहे. हिरवीगार असलेली पिके आठवडाभरातच करपत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आता हिरावला जात आहे. पेरणीपूर्व शेतकऱ्यांनी बँक, सावकारचे उंबरठे झिजवून व्याजासह पैसा देण्याच्या बोलीने त्यांने खर्च केला. महागाईच्या काळात बियाणे खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. समाधानकारक पिके येणार, अशी अपेक्षा घेवून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात करपलेली पिके अन् अश्रूच्या धारा दिसू लागल्या आहे.सध्या परिसरात विधानसभा निवडणुकीचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत. शेतकऱ्यांची पीक परिस्थिती कशी आहे, हे विचारणारे कार्यकर्ते आता मतदान कुणाच्या बाजुने होणार, अशी समीकरणे जुळविण्यात व्यस्त आहेत. निसर्गाच्या हुलकावणीने खरीप हंगाम धोक्यात आहे. महत्वाचा मानला जाणारा दिवाळी सण जवळ आला आहे. नगदी पीक असलेल्या सोयाबिनच्या शेंगा भरल्या नाहीत. कापसाच्या झाडाला बोंडे लागण्याआधीच डोळ्यादेखत कपाशी करपत आहे. खासगी सावकार, बकेचे कर्ज फेडायचे, आणि दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न आता पहाडावरील शेतकऱ्यांना पडला आहे. पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास रोजगारासाठी अनेक जण स्थलांतर करण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)