शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश

By admin | Updated: May 15, 2017 00:45 IST

शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली.

गुप्ता कुटुंबीयांचे सांत्वन : अहीर यांनी केली वादळी भागाची पाहणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात वादळी पावसाने शनिवारी थैमान घातले. त्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी रविवारी केली. यावेळी त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण नुकसानीचे सर्वेक्षण करून सर्वच नुकसानग्रस्तांना आर्थिक भरपाई मिळण्याकरीता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.ना. अहीर यांनी लालपेठ व जलनगर परिसरात प्रत्यक्ष भेट देवून प्रभावित कुटुंबीयांशी चर्चा केली. या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळेल, असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले. यावेळी ना. अहीर यांनी शहरातील वाढलेल्या वृक्षांमुळे दुर्दैवी घटनामध्ये भर पडत असल्याने या वृक्षांच्या फांद्या तोडण्याची सूचना केली. नैसर्गिक आपत्तीमुळे भविष्यात दुर्दैवी घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी तसेच लोकांचे कमीत कमी नुकसान होईल, या अनुषंगाने प्रशासकीय स्तरावरून प्रभावीपणे उपाययोजण्याबाबत अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पूर्व नियोजन करावे, अशा सूचनाही दिल्या.लालपेठ परिसरात झाड कोसळून गुप्ता यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ना. अहीर यांनी त्या कुटुंबाचे सांत्वन केले. या पाहणीमध्ये उपमहापौर अनिल फुलझेले, भाजप गटनेते वसंत देशमुख, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसीलदार खांडरे, नायब तहसीलदार घोरपडे, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भगत आदी उपस्थित होते. वादळग्रस्त भागाच्या पाहणी दौराप्रसंगी ना. हंसराज अहीर यांच्यासोबत लालपेठ प्रभागाचे नगरसेवक शाम कनकम, नगरसेवक राहुल घोटेकर, नगरसेवक प्रशांत चौधरी, मोहन चौधरी, संजय मिसलवार, भानेश मातंगी, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, राजकुमार चौधरी, सोनकुसरे, स्वप्नील कांबळे, क्रिष्णा यादव आदी उपस्थित होते.शेख जब्बीर कुटुंबीयांचे सांत्वनजलनगर वॉर्डातील शेख जब्बीर यांच्या सुहाना परवीन या दीड वर्षीय मुलीचे घराजवळील नालीत पडून नुकताच दुर्दैवी मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती प्राप्त होताच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या कुटुंबाच्या निवासस्थानी जावून त्यांचे सांत्वन केले. तसेच या कुटुंबाला आर्थिक मदत दिली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपाचे गटनेते वसंता देशमुख, नगरसेवक अ‍ॅड. राहुल घोटेकर, मोहन चौधरी आदींची उपस्थिती होती. अशा दुर्घटना भविष्यात घडू नय, यासाठी महानगरातील प्रत्येक प्रभागातील नाल्याची स्वच्छता तुंबलेल्या नाल्या व गाळ मिश्रित नाल्या व मोठे नाले सदैव स्वच्छ राहतील, याची दक्षता मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचनावजा अपेक्षा ना. अहीर यांनी व्यक्त केल्या.