शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तातडीने १० हजार रुपयांचे कर्ज देण्याचे बँकांना आदेश

By admin | Updated: June 17, 2017 00:31 IST

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

जिल्हा उपनिबंधक : कर्ज न दिल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाईनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने दहा हजार रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र अनेक बँका कर्ज देण्यासाठी शासकीय अध्यादेशाची प्रतीक्षा करीत होते. यातून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची बोळवण होत असल्याचा प्रकार लक्षात येताच सर्व बँकांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रूपयाचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक आर. डी. कौसडीकर यांनी दिले आहे.शासनाने तत्वत: कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकामध्ये नवीन कर्जासाठी येरझारा माराव्या लागत आहे. सदर आदेशाने शेतकऱ्यांना दिलासा मिळतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.राज्य शासनाने शेतकऱ्यांना काही निकषाच्या अधिन राहून कर्जमाफीची तत्वत: घोषणा केल्यानंतर तातडीची उपाययोजना म्हणून पेरणीसाठी बँकांमधून दहा हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना अडचण येत असल्यास त्यांनी १८००२३३०२४४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा उपनिबंधक कौसडीकर यांनी शुक्रवारी १४ जूनच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत ३० जून २०१६ रोजी थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी बियाणे व खते उपलब्ध करण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश बँकांना दिले आहे. शासन हमीच्या आधारे संबंधित बँकांनी शेतकऱ्यांना ही रक्कम कर्ज म्हणून द्यावी. ही अट सर्व बँकांना लागू राहणार आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या कर्ज माफीच्या रक्कमेतून सदर रक्कम समायोजित करण्यात यावी, असेही जिल्हा उपनिबंधकांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्ज घेण्यास अडचण आल्यास तालुका सहायक निबंधकाशी किंवा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील खासदार, आमदारासह, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषद सदस्य, शासकीय कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, आयकर रिटर्न भरणारे व्यक्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती, बँक व दुध संघाचे संचालक, चारचाकी वाहन असणारे कुटुंब अशा सधन व्यक्तींना मात्र ही सवलत मिळणार नसल्याचे शासन निर्णयात स्पष्ट आहे. पात्र व अपात्र व्यक्तीच्या संदर्भात अडचण असल्यास सहकार पणन, वस्त्रोद्योग विभागामार्फत निर्गमीत करण्यात आलेल्या शासन निर्णयाचा संदर्भ घ्यावा. गरीब व गरजू शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ मिळालाच पाहिजे, असे जिल्हा उपनिबंधक आर. डी. कौसडीकर यांनी म्हटले असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.