शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

ग्रामीण महिलांच्या जीवनात होत आहे नवपरिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:26 IST

प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : उज्ज्वला गॅस योजना ठरत आहे लाभदायक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री उज्वला गॅस, योजना महिलांसाठी नवसंजिवनी ठरली आहे. गॅस कनेक्शन मिळणे हे ग्रामीण क्षेत्रातील कुटुंबीयांना कठीण जात होते. नियोजन आणि दूरदृष्टीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ही बाब शक्य करून दाखविली आहे. गेली कित्येक वर्ष ग्रामीण भागातील महिलांच्या नशिबी चूल आणि धूर पाचवीला पूजला होता. तो उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून दूर होत आहे. हे सरकारचे मोठे यश असून आज देशातील हजारो खेडी धुरमुक्त होतानाच त्यांचे आरोग्यही सुरक्षित राहिले आहे. सामान्यातील सामान्य कुटुंबापर्यंत आज स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन पोहचले असल्याने ही नवक्रांती असून यापुढेही ग्रामीण महिलांच्या जीवनात नवपरिवर्तनाची पहाट उजेळल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.कुंभेझरी येथील उज्ज्वला दिवस व ग्राम स्वराज्य अभियान कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते. निवृत्ती एचपी गॅस एजन्सी जिवतीच्या वतीने शुक्रवारी कुंभेझरी येथील गोरगरीब महिलांना घरगुती गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार अ‍ॅड.संजय धोटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, जिवतीचे तहसिलदार गोपीनाथ चव्हाण, खुशाल बोंडे, जिल्हा परिषदेच्या सभापती गोदावरी केंदे्र, पं. स. उपसभापती महेश देवकते, भाजपा किसान आघाडीचे महामंत्री राजु घरोटे, आदिवासी नेते वाघु गेडाम, एच. पी. गॅसचे सेल्स आॅफीसर आशिष कुमार, प्रशांत गुंडावार आदींची उपस्थिती होती. आता विस्तारित उज्ज्वला योजनेद्वारे कनेक्शनपासून वंचित गोरगरीब महिलांना गॅस कनेक्शनचे वितरण केले जाणार आहे. कोणतेही कुटुंब या अत्यावश्यक सोयीपासून वंचित राहणार नाही. ही केंद्र सरकारची धारणा आहे. प्रत्येक घरात वीज व गॅस कनेक्शनकरिता सरकार कटीबद्ध असल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले. ग्राम स्वराज्य अभियानाद्वारे गावात लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही ना. अहीर म्हणाले. याप्रसंगी ना. अहीर व अतिथींच्या हस्ते गॅसचे वितरण सोबतच राशनकार्ड देण्यात आले.