शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन अध्यादेशामुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: February 9, 2015 23:11 IST

केंद्र सरकारने तयार केलेला नवीन भूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे.

कोरपना: केंद्र सरकारने तयार केलेला नवीन भूमिअधिग्रहण कायदा शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा तातडीने रद्द करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे.या नव्या कायद्यामुळे राष्ट्रीय खाद्य सुरक्षा व उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. केंद्रात २०१४ मध्ये भूसंपादन अधिग्रहण संबंधात काढलेला सुधारित अध्यादेश अन्यायकारक आहे. यूपीए शासन काळात सन २०१३ मध्ये या कायद्यात १३ प्रकारच्या सुधारणा करुन शेतकऱ्यांच्या मुलभूत अधिकारांना बळकट करण्याचे व नवीन उद्योगांना शेतकऱ्यांच्या सहमतीने बंधन घातले होते. परंतु केंद्राने नव्याने शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत नव्या कायद्यात उद्योगाला झुकते माप दिले असल्याचा आरोप आहे. इंग्रजांच्या काळातील १९९४ चा भूमिअधिग्रहण कायदा देशात चालविला जात होता. तत्कालिन यूपीए शासनाने त्यामध्ये सुधारणा करुन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी राज्यात आलेल्या कोळसा खाणी, पॉवर प्लॉंट व सिमेंट उद्योगांकडून एकरी आठ ते १५ लाख दर मिळाले. परंतु नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होणार आहे. उद्योगाच्या मनमर्जीने जमीन अधिग्रहीत करण्याचा डाव ग्रामीण शेतकऱ्यांसाठी घातक ठरणार आहे. केंद्र शासनाने नव्याने काढलेला जमीन अधिग्रहण धनादेश रद्द करावा, शेतकरी हिताचा अधिग्रहण कायदा कायम ठेवावा, नवीन सुधारित कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताला महत्व दिले नाही. यामुळे या कायद्यामुळे उपजाऊ जमिनींचे मोठे नुकसान होणार आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आली असल्याने अधिग्रहणासाठी घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबीद अली, विनोद जुमळे, अविनाश गौरकार, अशोक तुमराम आदींनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)