शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

शेतमालाच्या आधारभूत किमतीबाबत अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:35 AM

केंद्र सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती घोषित करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

वामनराव चटप : केंद्र सरकारद्वारे पुन्हा शेतकऱ्यांचा विश्वासघातलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने शेतमालाच्या आधारभूत किमती घोषित करताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतमाल उत्पादन करण्यासाठी येणाऱ्या खर्चात सतत वाढ होत असते आणि शेतमालाचे रास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. देशभर होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला न्याय न देता सरकारने शेतमालाच्या अत्यल्प आधारभूत किंमतीवाढीचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधानांनी निवडणुकीपूर्वी उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा देण्याचे आश्वासन दिले असताना आता चौथ्याही वर्षी शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी विश्वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केला आहे.केंद्र सरकारने सन २०१७-१८ या वर्षाकरिता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती घोषित केल्या आहे. कापसाला प्रति क्विंटल १६० रु. धानाला प्रति क्विंटल ५० रु. आणि सोयाबीनला प्रति क्विंटल २७५ रु. अशी नगण्य वाढ केली आहे. केंद्र सरकारने देशात सातव्या वेतन आयोगाची कर्मचाऱ्यांची पगारवाढ २३.५५ टक्के केली असताना शेतकऱ्यांना मात्र आत्महत्येच्या खाईत लोटण्याचा मार्ग खुला ठेवला आहे. १ जुलै २०१७ ते ३० जून २०१८ या कृषी आर्थिक वर्षासाठी कापसाची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ४३२० रु. सोयाबिन ३०५० रु. व धान १५६० रु. याप्रमाणे घोषित केली आहे. हीच किंमत मागील वर्षी कापूस ४१६० रु. सोयाबीन २७७५ रु. व धान १५१० रु. एवढी होती. केंद्रात सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने परिवर्तनाचा नारा देत व अच्छे दिन येणार असल्याचे स्वप्न दाखवून आणि शेतकरी हिताचा आव आणून मतांचा जोगवा मागितला होता. भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आधारभूत किंमतीत घसघशीत वाढ करुन देईल आणि काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांबाबत केलेल्या अन्यायाचे परीमार्जन करेल, अशी अपेक्षा देशातील शेतकऱ्यांना होती. असे अभिवचनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. परंतु सत्तेवर येताच भाजपचा शेतकरीविरोधी चेहरा उघड झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आत्महत्येचे सत्र सुरुच असून ते वाढत आहे. मागील तीन वर्ष केंद्र सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. या चौथ्या वर्षी देशभर झालेली प्रचंड शेतकरी आंदोलने आणि कर्जमाफीचा मुद्दा यामुळे यापुढे कर्जमाफीची पाळी येऊच नये म्हणून आधरभूत किंमतीत घसघसीत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या आधारभूत किंमतीत केलेल्या अत्यल्प वाढीमुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकटात टाकले आहे, असेही अ‍ॅड. वामनराव चटप यांनी म्हटले आहे.सरकारच्या या धोरणाचा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, अनिल ठाकूरवार, अरुण नवले, पोर्णिमा निरंजणे, निलकंठ कोरांगे, राजेश कवठे, कमल वडस्कर, अ‍ॅड. शरद कारेकर, सुधीर सातपुते, अ‍ॅड. नि. गो. मोरांडे, रघुनाथराव सहारे, प्रा. रामभाऊ पारखी, हरिदास बोरकुटे, विवेक मांदाडे, कवडू येनप्रेडीवार, अशोक मुसळे, रमेश नळे, दिवाकर मानुसमारे, मारोतराव काकडे, बंडू राजूरकर, मदनपाटील सातपुते, तुकेश वानोडे, वासुदेव उरकुडे, कवडू बुटले आदींनी यांनी निषेध केला असून सरकारने शेतकरीविरोधी धोरण सोडावे, अशी मागणीही केली आहे.