शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

महिलांनी घेतली आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:35 IST

राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजुरा महिला किसान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून तालुका अभियान कक्ष राजुरातर्फे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडीत महिलांचा अभ्यास दौरा.....

ठळक मुद्देमहिला किसान सबलीकरण योजना : चनाखा येथील कृषी पर्यटन केंद्रात अभ्यास दौरा

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राजुरा महिला किसान सबलीकरण योजनेच्या माध्यमातून तालुका अभियान कक्ष राजुरातर्फे ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राशी निगडीत महिलांचा अभ्यास दौरा चनाखा येथील एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्रात नेण्यात आला. या ठिकाणी आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसायाबाबतच्या महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मुलनासाठी केंद्र शासनाने राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली आहे. गरीब गरीबीतून बाहेर पडू शकतो त्यास आवश्यक सहाय्य दिले पाहिजे. या विश्वासातून गरीबांसाठी संस्था निर्माण करुन त्या माध्यमातून ग्रामीण भागातील गरीबांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने कुशल आणि प्रभावी व्यासपीठ देण्यात येते. गरीबांचे सबलीकरण करण्यासाठी त्यांचे हक्क, न्याय, सार्वजनिक व सामाजिक सेवा त्यांच्यापर्यंत पोहचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.या अभियानाअंतर्गत राजुरा महिला किसान सबलिकरण योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील १० कृषी सखी व १० महिला बचत गटातील ५० महिलांच्या एका चमूचा अभ्यास दौरा पार पडला. चनाखा या कृषी पर्यटन केंद्रास भेट देऊन तेथे करण्यात येणारी आधुनिक शेती, शेतीतील पुरक व्यवसाय, सोबतच नव-नवीन तंत्रज्ञान, शेती पिकांसोबतच फळे, फुले, भाजीपाला व इतर माध्यमातून कशा प्रकारे उत्पन्नात वाढ करता येईल, याची माहिती महिलांनी देण्यात आली.याप्रसंगी राष्टÑीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राजुरा तालुका व्यवस्थापक संतोषी उमक, तालुका व्यवस्थापक नरेंद्र नगराळे, एक मोकळा श्वास कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सुहास आसेकर, रिंकू मरस्कोले व विविध बचत गटाच्या महिला, कृषी सखी उपस्थित होत्या.