शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा परिणाम : सोयाबीन, कापसानंतर आता भाजीपालाही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शेतकरी कापूस, धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करतात. यावर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून विविध किटकनाशकांची फवारणी करून रोगांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर पालेभाज्यांची आवक चंद्रपूर बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी आधुनिक पद्धतीने रबी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता भाजीपाला पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.गव्हावर अळीचा प्रादुर्भावपरतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेली. आता रब्बीच्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. हरभरा पाठोपाठ गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाळत चालली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यावेळी सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने मोठे नुकसान झाले. मात्र यावर्षी नदी-नाले तलाव, विहिरीत भरपूर पाणी असल्याने रब्बीची पेरणी केली. पाणी देणे, खत टाकणे हे काम सुद्धा चालू आहे. परंतु हरभरा पाठोपाठ आता गव्हाची उभी पिके वाळत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी खरीब हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. त्यामुळे सरकार आर्थिक मदत करेल या आशेवर शेतकरी आहे. तर दुसरीकडे या हंगामातील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे परिणाम पडत आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.-रामदास देवाळकर, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती