शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.

ठळक मुद्देढगाळ वातावरणाचा परिणाम : सोयाबीन, कापसानंतर आता भाजीपालाही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शेतकरी कापूस, धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करतात. यावर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून विविध किटकनाशकांची फवारणी करून रोगांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.मागील काही वर्षांपासून शेतकरी इतर पिकांसह भाजीपाला पिकांची लागवड करीत आहे. यामध्ये वांगी, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेवून आपल्या शेतात छोट्या मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. मात्र रबी हंगामात भाजीपाला पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाले असून विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत.ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर पालेभाज्यांची आवक चंद्रपूर बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकरी आधुनिक पद्धतीने रबी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले असून कापूस, सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता भाजीपाला पिकही हातचे जाण्याची शक्यता आहे.गव्हावर अळीचा प्रादुर्भावपरतीच्या पावसाने थैमान घातल्याने खरिपाची पिके हातची गेली. आता रब्बीच्या पिकांवर शेतकऱ्यांची मदार आहे. हरभरा पाठोपाठ गहू पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पिके वाळत चालली आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. यावेळी सोयाबीन, कापूस आदी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने मोठे नुकसान झाले. मात्र यावर्षी नदी-नाले तलाव, विहिरीत भरपूर पाणी असल्याने रब्बीची पेरणी केली. पाणी देणे, खत टाकणे हे काम सुद्धा चालू आहे. परंतु हरभरा पाठोपाठ आता गव्हाची उभी पिके वाळत चालल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.यावर्षी खरीब हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीनची अक्षरश: वाट लागली. त्यामुळे सरकार आर्थिक मदत करेल या आशेवर शेतकरी आहे. तर दुसरीकडे या हंगामातील रब्बी पिकांवर ढगाळ वातावरणामुळे परिणाम पडत आहे. त्यामुळे या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.-रामदास देवाळकर, शेतकरी, गोवरी

टॅग्स :agricultureशेती