शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेच्या सामग्रीला महागाईच्या झळा

By admin | Updated: June 8, 2017 03:23 IST

जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला

लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : जन्मो जन्मी मला हाच पती मिळावा तसेच पतीच्या दिर्घायुष्याबाबत प्रार्थना करण्यासाठी विक्रमगडमधील महिलावर्ग सज्ज झाला असून बुधवारी आठवडे बाजारात वटसावित्रीच्या सामग्रीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. उपवासाचा हा दिवस मोठ्या श्रद्धेचा मानला जातो. आधुनिक काळातही त्याचा महिमा तसूभरही कमी झालेला नाही. या व्रतासाठी विक्रमगडमधील नवविवाहीता तीन दिवस उपवास करुन चौथ्या दिवशी विधीवत पूजा करतात. त्या वेळेस पूजेसाठी लागणाऱ्या करंडाफणी, आंब्यांचे वाण, हळद-कुंकू, हिरव्या बांगडया, खारीक, बदाम, सुपारी, फणस यांचे दर वाढलेले आहेत. वट पौर्णिमेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही महागाइची झळ बसली असून त्यांच्या किंमतीत दुपटीने वाढ झाली आहेत. आंबा एक नग ५ ते १० रुपये, करडांफणी ८ ते १० रुपये, हिरव्या बांगडया २५ ते ३० रुपये डझन, फणस गरा ४ ते ५ रुपये, खरीक एक नग ४ ते ५ रुपये, बदाम एक नग ४ ते ५ रुपये, हळद-कुंकू १५ ते २० रुपये, सुपारी एक नग ५ ते १० रुपये अशी वाढ झाली आहे.>‘जुन्या परंपरा मोडल्या जात आहेत’पूर्वी गावात एक ते दोनच ठिकाणी वडाखाली पूजा केली जात असे. परंतु, आता ही परंपरा लोप पावत चालेली असून ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात वडाच्या फांद्या देवळात आणून अनेक ठिकाणी पुजा मांडल्या जातात. महिला आपल्या सवडीनुसार येऊन पूजा करतात़ पूर्वी असे नव्हते आता आधुनिक युगाबरोबर परंपराही मोडल्या जात आहेत़, अशी खंत विक्रमगड येथील ज्येष्ठ महिला कमल औसरकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली.वटपूजन दुपारी साडेबारापर्यंतच : दाते पंचागवटपौर्णिमा गुरुवारी ८ जून रोजी दुपारी ४़ ३० नंतर शुक्रवारपर्यत आहे़ पण चतुर्दशी ही गुरुवारी आहे़ आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते़ म्हणून पूजन हे गुरुवारी सूर्योदयापसून ते मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु़ १२.३० पर्यतच करणे बंधकारक आहे. तरी सर्व महिलांनी दु. १२़ ३० पर्यतच पूजन करावे नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ७़ ते ८ व ११ ते १२़ ३० पर्यत पूजन करावे असे दाते पंचांगमध्ये म्हंटले आहे़ वटासावित्रीचे व्रत अतिशय पवित्र आणि मांगल्याचे मानले जाते़ त्यासाठी पौर्णिमेच्या आदल्या दोन दिवस व पौर्णिमा झाल्यावर चंद्रोदय होईपर्यत असे एकूण चार दिवस उपवास करतात. - भुरी धवल पटेल,अजूनही जुनी परंपरा विक्रमगड व ग्रामीण भागात महिलांनी जोपसली असून आधुनिक काळातही नवविवाहीत सौभाग्यवती आपल्या पतीसाठी चार दिवस उपवास करते व हे व्रत पूर्ण करते़- रजनी अरुण मनारे , विक्रमगड