शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून ...

दरम्यान, मागील दोन ते तीन दिवसापासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील काही वर्षांपासून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे मोठे नुकसान झाले, तर अतिपावसामुळे कपाशीवर बोंडअळी आली. त्यामुळे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. दरम्यान, धान पिकाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, रब्बीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे सुरू केले. हरभरा, गहू आदी पिकांची लागवड केली. मात्र हे पिकही सद्यस्थितीत बिकट अवस्थेत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, हरभरा पेरणीवर यावर्षी शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. सध्या हरभरा पीक चांगले बहरले असतानाच आता ढगाळी वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अळीला आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहेत. मात्र अळी आटोक्यात येत नसल्याने हे पिकही हातून जाते की काय, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीचे औषध पुरवावे, अशी मागणी केली जात आहे.