शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

विद्यार्थ्यांचा दररोज पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:41 IST

राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु अनेक दुर्गम भागातील शिक्षणाची स्थिती पाहिली

सीमेवरील विद्यार्थ्यांची व्यथा : एसटी महामंडळाची बसफेरीच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु अनेक दुर्गम भागातील शिक्षणाची स्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास पायदळ करावा लागत आहे. येण्या-जाण्याच्या साधनाअभावी अनेकवेळा त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील सीमावर्ती भागातील १४ गावे वादग्रस्तच ठरली आहेत. येथे दोन्ही राज्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण शिक्षणाची एक ते चार ही प्राथमिक सुविधा वगळली तर पुढचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर कोणताही पर्याय नाही. येथील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेताना दिसत होते. पण दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत. तालुक्यातील अनेक शाळेत तेलगु शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह वाहताना दिसतो आहे. मात्र वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. सीमेवरील विद्यार्थ्यांसाठी महामंडळाने सकाळ- संध्याकाळ बसेस सोडल्या तर विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होईल.सीमेवरील गावे वादग्रस्त असली तरी आम्हाला महाराष्ट्र राज्य आणि मराठी शाळा याबद्दल खूप अभिमान आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाच्या बसेस गावात येत नसल्याने नाईलाजास्तव तेलंगणात शिकावे लागत होते, असे येथील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत्’ाशी बोलताना सांगितले.आजही येथील अनेक विद्यार्थी बसेसअभावी पायदळ शाळेत जातात, तर २५ किमी अंतर खाजगी आॅटोत जीवघेणा प्रवास करुन जिवतीला शिकायला येतात.शासनाने विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशन योजनेच्या बसेस सुरु केल्या आहेत. पण या भागात या योजनेच्या बसेस पोहचल्याच नाहीत. सीमेवर १४ गावे असली तरी या गावात महामंडळाच्या बसेसच धावत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. सोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होत आहे.महामंडळाने किमान दोनदा बस सोडावीसीमावर्ती परमडोली, मुकदमगुडा, कोटा, शंकरलोधी येथील अनेक विद्यार्थी जिवती, नोकेवाडा, दमपूर मोहदा येथे पायदळ तसेच आॅटोने जाऊन शिक्षण घेतात. परंतु महामंडळाची बसेस या गावात येत नाही. सकाळी ११ वाजताची बस येते. त्यानंतर बसेस येत नाही. सायंकाळला पाच वाजता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी सात- आठ वाजता बसफेरी उपलब्ध करावी, अशी मागणी या सीमावर्ती गावातील नागरिकांनी केली आहे.