शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

विद्यार्थ्यांचा दररोज पायदळ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:41 IST

राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु अनेक दुर्गम भागातील शिक्षणाची स्थिती पाहिली

सीमेवरील विद्यार्थ्यांची व्यथा : एसटी महामंडळाची बसफेरीच नाहीलोकमत न्यूज नेटवर्कजिवती : राज्य सरकार शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. परंतु अनेक दुर्गम भागातील शिक्षणाची स्थिती पाहिली तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. जिवती तालुक्यातील महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त गावातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दूरचा प्रवास पायदळ करावा लागत आहे. येण्या-जाण्याच्या साधनाअभावी अनेकवेळा त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील सीमावर्ती भागातील १४ गावे वादग्रस्तच ठरली आहेत. येथे दोन्ही राज्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. पण शिक्षणाची एक ते चार ही प्राथमिक सुविधा वगळली तर पुढचे शिक्षण घेण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर कोणताही पर्याय नाही. येथील विद्यार्थी गेल्या अनेक वर्षापासून तेलंगणा राज्यात तेलगु शिक्षण घेताना दिसत होते. पण दोन-चार वर्षापासून हे सर्व विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत. तालुक्यातील अनेक शाळेत तेलगु शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवाह वाहताना दिसतो आहे. मात्र वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. सीमेवरील विद्यार्थ्यांसाठी महामंडळाने सकाळ- संध्याकाळ बसेस सोडल्या तर विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर होईल.सीमेवरील गावे वादग्रस्त असली तरी आम्हाला महाराष्ट्र राज्य आणि मराठी शाळा याबद्दल खूप अभिमान आहे. परंतु महाराष्ट्र सरकारच्या महामंडळाच्या बसेस गावात येत नसल्याने नाईलाजास्तव तेलंगणात शिकावे लागत होते, असे येथील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत्’ाशी बोलताना सांगितले.आजही येथील अनेक विद्यार्थी बसेसअभावी पायदळ शाळेत जातात, तर २५ किमी अंतर खाजगी आॅटोत जीवघेणा प्रवास करुन जिवतीला शिकायला येतात.शासनाने विद्यार्थिनींसाठी मानव विकास मिशन योजनेच्या बसेस सुरु केल्या आहेत. पण या भागात या योजनेच्या बसेस पोहचल्याच नाहीत. सीमेवर १४ गावे असली तरी या गावात महामंडळाच्या बसेसच धावत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले. सोबतच सर्वसामान्य नागरिकांचेही हाल होत आहे.महामंडळाने किमान दोनदा बस सोडावीसीमावर्ती परमडोली, मुकदमगुडा, कोटा, शंकरलोधी येथील अनेक विद्यार्थी जिवती, नोकेवाडा, दमपूर मोहदा येथे पायदळ तसेच आॅटोने जाऊन शिक्षण घेतात. परंतु महामंडळाची बसेस या गावात येत नाही. सकाळी ११ वाजताची बस येते. त्यानंतर बसेस येत नाही. सायंकाळला पाच वाजता तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सकाळी सात- आठ वाजता बसफेरी उपलब्ध करावी, अशी मागणी या सीमावर्ती गावातील नागरिकांनी केली आहे.