शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

नागभीड येथे ७ जून रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हा रिपोर्ट हाती पडताच प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. परिसर सील करताना रुग्ण राहत असलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागही घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देरुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह : नियम शिथिल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : येथील कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रामुळे समस्येत वाढ झाली आहे. आता संपर्कातील व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आल्याने या प्रतिबंधित क्षेत्रातील नियम शिथिल करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.नागभीड येथे ७ जून रोजी एका व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. हा रिपोर्ट हाती पडताच प्रशासनाने संपूर्ण परिसर सील केला. परिसर सील करताना रुग्ण राहत असलेल्या परिसराव्यतिरिक्त अन्य भागही घेण्यात आला. त्यामुळे आता या प्रतिबंधित क्षेत्रात राहत असलेल्या नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.या प्रतिबंधित क्षेत्रात राहणारे नागरिक शेतीशी संबंधित आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांंची आवते व पऱ्हे भरण्याची वेळ आहे. पण परिसर सील करण्यात आल्यामुळे या परिसरात राहणाºया शेतकऱ्यांना बाहेर पडता येत नाही. याच परिसरात नोकरदार वर्गही आहे. त्यांनाही त्यांच्या कामावर जाता येत नाही.याशिवाय याच प्रतिबंधित क्षेत्रात अनेक व्यापाºयांची निवासस्थाने आहेत. त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने शहरात असली तरी निवासस्थान प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने त्यांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कोरोना रूग्ण ७ जूनला आढळून आला. त्यानंतर या रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचेही नमुने निगेटिव्ह आले. या पार्श्वभूमीवर या परिसरात राहणारे शेतकरी व व्यापाºयांना त्यांच्या कामावर जाऊ द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे.दुकाने ७ वाजेपर्यंत सुरू ठेवावीसध्या ५ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. नागभीड नगर परिषद असली तरी येथे शेतकऱ्यांची व शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांची संख्या मोठी आहे. हे दोन्ही वर्ग अगदी सकाळपासून शेतीच्या कामासाठी शेतावर जातात. सायंकाळी ६ नंतरच ते घराकडे परततात. मात्र दुकाने ५ वाजताच बंद होत असल्याने जीवनावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी मोठी तारांबळ उडत आहे. सामान्य नागरिकांची गरज लक्षात घेऊन दुकाने ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.दुकाने व व्यापारी प्रतिष्ठाने सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असणे ही नागरिकांची गरज आहे. येथे शेतकरी व शेतमजूर वर्ग मोठा आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा वर्ग शेतातच असतो. त्यामुळे ७ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी.- गुलजारभाई धम्माणी, अध्यक्ष, व्यापारी संघ, नागभीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या