शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मानधन व प्रवास भत्त्यात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 23:08 IST

जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देसिकलसेल नियंत्रण कर्मचाऱ्यांची मागणी : हंसराज अहीर यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदतर्फे सिकलसेल नियंत्रण कर्मचारी म्हणून काम करणाºयांना अत्यल्प मानधन व प्रवासभत्ता दिला जातो. परिणामी त्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागते. त्यामुळे मानधन व प्रवासभत्यांमध्ये वाढ करण्याची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेच्या वतीने जानेवारी २०११ पासून चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे नियंत्रण कार्यक्रम राबविल्या जात आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यात १ जिल्हा रुग्णालय, चार उपजिल्हा रुग्णालय, नऊ ग्रामीण रुग्णालय आणि ५८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर्गत जिल्हा समन्वयक, तालुका पर्यवेक्षक, सिकलसेल स्वयंसेवक, डाटा एंट्री आॅपरेटर आदी कर्मचारी सर्व्हेक्षण, औषधोपचार आणि जनजागृतीचे कार्य प्रभावीपणे करत आहेत.मात्र शासनाकडून या कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्याकरिता फारच तुटपुंजी रक्कम स्वयंसेवी संस्थेला मिळत आहे. आजचे महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांना आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह सद्याचे मानधन रकमेत करणे कठीण झाले आहे. तर एसटी महामंडळाच्या प्रवास भाडेवाढमुळे कर्मचाºयांना प्रवासभत्ताही पुरेसा नाही. त्यामुळे शासनाने इतर कंत्राटी कर्मचाºयांप्रमाणे सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत कर्मचाºयांचे मानधन आणि प्रवास भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम व जिल्हा कृती समितीचे वतीने निवेदनातून करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव उमाकांत धांडे, समितीचे अध्यक्ष संजय उमरे, सचिव कृष्णा पाहुणे, वंदना हिंगे, अशोक गिरडकर, विजय घोडमारे, शकील शेख आदी उपस्थित होते.