शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:31 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल : पीक विमा योजनेचेही संरक्षण नाही

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. कापसाचे पीक अंतिम टप्प्यात असताना बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस पिकाला विमा योजनेचे संरक्षण नाही. अशातच कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाने चांगलाच दगा दिला. यामुळे भाताचे उत्पादन हातून गेले. सरासरीच्या ५० टक्केही धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात आले नाही. शेतकºयांची आशा कापूस पिकावर होती. खरीप हंगामातील याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा होता. परंतु कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रदुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव (पोडे), विसापूर, हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), कोठारी, दहेली, कळमना, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, किन्ही आदी गावात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ निसर्गाने आणली आहे.बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना शासनाने पीक विमा योजनेतून वगळण्याचे कारस्थान केले. शासनाच्या पिकविमा योजनेचा लाभ नाही व बोंडअळीचा मारही सहन करायचा, या दुहेरी संकटात तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला आहे. शासकीय पातळीवर सर्वेक्षणाचा सोपस्कार केला जाणार असला तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शासनाने तालुक्यातील अडचणींत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.धान उत्पादकासोबतच कापूस उत्पादकही संकटातबल्लारपूर तालुक्यात धान व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यामध्ये ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. धान पिकाचे क्षेत्र २ हजार ९०९६० हेक्टर आहे. तूर पिकांचे ३७३.३० हेक्टर तर सोयाबिनचा पेरा ३३३.२० हेक्टरवर आला आहे. तालुक्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अर्धेच झाले. परिणामी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाले. कापूस पीक जोमाने आले. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकºयांवर नामुष्की ओढवली. यामुळे तालुक्यात धान उत्पादक शेतकºयांसोबत कापूस उत्पादकही संकटात सापडला आहे.बल्लारपूर तालुक्यात कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याची सूचना कृषी विभागाला देण्यात आली. सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षण अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळावी, म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- गोंविदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर