शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 23:31 IST

बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली.

ठळक मुद्देबल्लारपूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल : पीक विमा योजनेचेही संरक्षण नाही

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात खरीप हंगामाचे एकूण नऊ हजार ३७९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी दोन हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. कापसाचे पीक अंतिम टप्प्यात असताना बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कापूस पिकाला विमा योजनेचे संरक्षण नाही. अशातच कापसावर बोंडअळीने आक्रमण केल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाने चांगलाच दगा दिला. यामुळे भाताचे उत्पादन हातून गेले. सरासरीच्या ५० टक्केही धानाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या दारात आले नाही. शेतकºयांची आशा कापूस पिकावर होती. खरीप हंगामातील याच पिकांवर शेतकऱ्यांचा आर्थिक डोलारा उभा होता. परंतु कापूस पिकांवर बोंडअळीचा प्रदुर्भाव वाढल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव (पोडे), विसापूर, हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), कोठारी, दहेली, कळमना, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, किन्ही आदी गावात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील शेतकऱ्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावाने मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ निसर्गाने आणली आहे.बल्लारपूर तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असताना शासनाने पीक विमा योजनेतून वगळण्याचे कारस्थान केले. शासनाच्या पिकविमा योजनेचा लाभ नाही व बोंडअळीचा मारही सहन करायचा, या दुहेरी संकटात तालुक्यातील शेतकरी वर्ग सापडला आहे. शासकीय पातळीवर सर्वेक्षणाचा सोपस्कार केला जाणार असला तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल, याची शाश्वती नाही. यामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. शासनाने तालुक्यातील अडचणींत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.धान उत्पादकासोबतच कापूस उत्पादकही संकटातबल्लारपूर तालुक्यात धान व कापूस प्रमुख पीक आहेत. एकूण सहा हजार ७६५ हेक्टर क्षेत्र खरीपाचे आहे. यामध्ये ३ हजार ११५.८० हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड केली जाते. धान पिकाचे क्षेत्र २ हजार ९०९६० हेक्टर आहे. तूर पिकांचे ३७३.३० हेक्टर तर सोयाबिनचा पेरा ३३३.२० हेक्टरवर आला आहे. तालुक्यात पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत अर्धेच झाले. परिणामी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षाही कमी झाले. कापूस पीक जोमाने आले. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने शेतकºयांवर नामुष्की ओढवली. यामुळे तालुक्यात धान उत्पादक शेतकºयांसोबत कापूस उत्पादकही संकटात सापडला आहे.बल्लारपूर तालुक्यात कापूस पिकावर बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. याची सूचना कृषी विभागाला देण्यात आली. सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. सर्वेक्षण अहवाल तातडीने सादर करण्याची विनंती करण्यात आली असून नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाई मिळावी, म्हणून शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- गोंविदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर