शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

धानपिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2022 23:38 IST

सध्या धान पीक जोमात असून, गर्भावस्था सुरू आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पनाची आशा होती. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिके रोगग्रस्त झाली आहेत. आता शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. या परिसरातील राजोली, डोंगरगाव, चिखली, गांगलवाडी, मुरमाडी, गोलाभूज, नवेगाव, लोणखैरी, पेटगाव आदी गावांत यावर्षी सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : यावर्षी पावसाने कहर केला असून, अधूनमधून त्याची हजेरी सुरूच आहे. या सततच्या पावसाने पिकांना संवर्धनासाठी पाहिजे तशी उघडीप मिळाली नाही. परिणामी, धानरोपे प्रभावित होऊन विविध रोगाने ग्रासल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे धान पीक धोक्यात येण्याची भीती वर्तविली जात आहे. आधीच पाऊस पाण्याने चिंताक्रांत असलेल्या शेतकऱ्यांना आता पिकावरील रोगाने चिंता वाढविली आहे.सध्या धान पीक जोमात असून, गर्भावस्था सुरू आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पनाची आशा होती. मात्र, काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पिके रोगग्रस्त झाली आहेत. आता शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.या परिसरातील राजोली, डोंगरगाव, चिखली, गांगलवाडी, मुरमाडी, गोलाभूज, नवेगाव, लोणखैरी, पेटगाव आदी गावांत यावर्षी सरासरीपेक्षा दीडपट पाऊस झाला. त्यामुळे शेतातील बांद्यात अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला नाही. शिवाय सततच्या पावसाने व ढगाळ वातावरणाने धान रोपांवर विपरित परिणाम होऊन पिके रोगग्रस्त झाली आहे. वरवर समाधानकारक दिसणारे पीक आतून खोडकिडीसारख्या घातक रोगाने पोखरून गेले असून, कडाकरपा अळीने मोठ्या प्रमाणावर थैमान मांडले आहे.

फवारणी करूनही उपयोग नाहीशेतकरी वर्ग कीटकनाशकांची फवारणी करून किडीचे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु सततच्या पावसामुळे फवारणीचा काहीही उपयोग होत नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आधीच दुबार, तिबार पेरणीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिकाच्या रोगाचे संकट उभे राहिल्याने तो धास्तावला आहे.

 

टॅग्स :agricultureशेती