शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आम्हच्या वाट्याचे अन्नधान्य गरीबांना द्या; बल्लारपुरात अन्नधान्य योजनेतून 'ते' पडले बाहेर

By साईनाथ कुचनकार | Updated: September 7, 2022 16:56 IST

चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडले आहेत.

चंद्रपूर :अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशनवर धान्य दिले जाते. मात्र अनेकवेळा गरज नसतानाही लाभार्थी धान्य उचलतात. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज असते. अशा लाभार्थ्यांना वंचित रहावे लागते. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज नाही, अशा लाभार्थ्यांनी अन्नधान्य योजनेतून बाहेर पडण्याचे आवाहन अन्नधान्य पुरवठा विभागाने केले होते.

या आवाहनानंतर चंद्रपूरनंतर, बल्लारपूर तालुक्यातील काही नागरिक स्वमर्जीने या योजनेतून बाहेर पडले आहेत.यासंदर्भातील अर्ज त्यांनी तहसीलदार डाॅ. कांचन जगताप, अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्याकडे सुपूर्द केला. यांच्यासह अन्य नागरिकांनी योजनेतून बाहेर पडण्याची आवाहन करण्यात आले आहे. पुरवठा विभागाने केलेल्या आवाहनानुसार दहेली येथील विलास बोबडे दहेली, बल्लारपूर रतन सिंग बुंदेल यांनी स्वमर्जीने योजनेतून बाहेर पडत आपल्या वाट्यातील धान्य गरजू लाभार्थ्यांना देण्याची विनंती केली आहे.गरज नसेल तर योजना सोडावी 

ज्या नागरिकांना स्वस्त धान्य नको आहे, अशा नागरिकांनी पुरवठा विभागाकडे किंवा रेशन दुकानदारांकडे अर्ज भरून रेशनवरील धान्य नाकारता येते. यामुळे समाजातील गरिब तसेच गरजु नागरिकांना हे धान्य देता येणार आहे. अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेमध्ये अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.रेशन दुकानात करा अर्ज 

अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गट, अंत्योदय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य दिल्या जाते. कोरोना संकटापासून गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वितरण केल्या जात आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना धान्याची खरोखर गरजनाही. त्या लाभार्थ्यांनी रेशनवरील मिळणारे धान्य नाकारले पाहिजे. यामुळे गरीब तसेच गरजूंना लाभ मिळू शकतो. यासाठी संबंधित रेशन दुकानदार, पुरवठा विभागाकडे अर्ज करावा लागतो.अन्नधान्य योजनेतून बाहेर पडा योजनेद्वारे ज्या नागरिकांना अन्नधान्याची गरज नाही. अशा नागरिकांनी रेशनवरील धान्य उचलू नये, त्यांनी योजनेतून बाहेर पडावे,ज्या नागरिकांचे आर्थिक उत्पन्न कमी आहे, उदरनिर्वाह करणे कठीण आहे, अशांना रेशनवरील धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या नागरिकांनी हे धान्य नाकारले पाहिजे. 

- डाॅ. कांचन जगताप, तहसीलदार, बल्लारपूर

टॅग्स :Socialसामाजिकballarpur-acबल्लारपूरfoodअन्न