शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:37 IST

जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी,...

संपर्क अधिकारी नियुक्त : महिन्याच्या पहिल्या सोमवारी शाळेचा ड्रा चंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण व्हावी, शाळेचा परिसर आल्हादायक, नयनरम्य व आरोग्यदायी रहावा, विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणात शिक्षण घेता यावे, यासाठी प्रत्येक तालुक्यात संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. महिन्यातील एका बुधवारी शाळेला भेट देवून तो सर्वांगाने शाळेचे निरीक्षण करून शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी. सिह यांनी शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल व्हावा, जि.प.च्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठी शाळेला कुठल्या सोयी सुविधेची गरज आहे, यासाठी प्रत्येक तालुक्यात जि.प. च्या विभाग प्रमुख यांना तालुका संपर्क अधिकारी म्हणून तालुके दत्तक दिले आहे. याच्यामार्फत पंचायत समिती स्तरावर संपर्कात राहून विविध योजनांचा आढावा घेऊन योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यानुसर शिक्षण विभागासाठी प्रत्येक तालुक्याच्या नेमण्यात आलेल्या संपर्क अधिकारी यांच्या नेतृत्त्वात एक समिती गठीत करून या समितीत जिल्हास्तरीत विभाग प्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांचा समावेश राहिल. या समितीचीे जिल्हा परिषदेला जिल्हास्तरावर महिन्याच्या पहिल्या सोमवारी बैठक घेऊन ड्रा काढला जाईल, या ड्रामध्ये ज्या शाळांचे नाव निघणार, त्या शाळेला या समिती अंतर्गत बुधवारी भेट देऊन तपासणी केली जाईल. यामध्ये विविध अंगाने शालेय सोयी सुविधा, शिक्षणाचा दर्जा, शाळा व्यवस्थापन समितीची बैठक, शाळा परिसराची पाहणी, शाळेत अस्तित्वात असलेल्या सोई सुविधांची पाहणी, प्लॅस्टिक निर्मूलन, भौतिक सुविधा, शाळेचे मैदान, शालेय शौचालय, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शैक्षणिक सुविधा, दैनिक परिपाठ, शालेय पोषण आहार, गणवेश व पाठ्यपुस्तक, विविध शालेय उपक्रम, शालेय मुलींवर होणारे अत्याचार यावरसुद्धा या समितीद्वारा लक्ष केंद्रित केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्हा परिषद शाळेकरिता हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच राबविला जात आहे. याद्वारे शाळा शैक्षणिकदृष्टया मजबूत होऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला आनंददायी व खेळीमेळीच्या वातावरणात जीवन कौशल्य निर्माण करण्याचे धडे मिळेल व तो उद्याचा चांगला नागरिक होईल. यासाठी हा प्रयत्न आहे. - देवेंदर सिंहमुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद, चंद्रपूर