शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

गोदाम सोडले अन् दुकानांवर छापे

By admin | Updated: October 22, 2015 00:46 IST

सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

पथक पोहोचले रिकामे : डाळ साठेबाजांवर प्रशासनाची कारवाई संशयास्पदचंद्रपूर : सणासुदीच्या दिवसांत आभाळाला भिडलेल्या डाळीच्या महागाईवर आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानुसार ‘मकेका’ अंतर्गत राज्यभरात साठेबाजांवर छापे टाकून कारवाई सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने बुधवारी केलेली कारवाई संशयास्पद असून गोदाम सोडून दुकानांची चौकशी पथकाकडून करण्यात आली. मात्र त्यांना काहीच हाती लागले नाही.राज्य शासनाने निर्देश देताच मंगळवारी राज्यभरात डाळ साठेबाजांवर छापे टाकण्यात आले. सर्व जिल्हा प्रशासनाकडून साठेबाजांवर कारवाई सुरू झाल्याने साठेबाजही सर्तक झाले आहेत. साठा करून ठेवलेला माल सुरक्षीत स्थळी हलविण्याच्या त्यांच्याकडून हालचाली सुरू आहेत. अशातच शासनाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनानेही बुधवारी दुपारी पाच सदस्यीय पथकाद्वारे चंद्रपुरात छापे टाकण्यात आले. या पथकाने गंज वार्र्डातील तीन दुकानांना भेटी देऊन डाळ साठ्याची चौकशी केली. मात्र या तपासणीत त्यांच्या हाती काहीच लागले नाही. साठेबाज हे साठा दुकानात नाही तर गोदामात करून ठेवतात, हेही या पथकाला समजले नसावे, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. पाच सदस्यीय पथकात चंद्रपूरचे तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार जगताप, पुरवठा निरीक्षक अधिकारी सलामे, पुरवठा निरीक्षक धारणे, माने यांचा समावेश होता. (स्थानिक प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार गंज वॉर्डातील तीन दुकानांची चौकशी करण्यात आली. गोदाम आणि दुकान हे एकाच ठिकाणी होते. दुकानाच्या तपासणीत डाळ परवाना दिल्यापेक्षा साठा कमी आढळून आला. - गणेश शिंदे,तहसिलदार, चंद्रपूर.