शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची आवक घटली; भाव चार हजार तीनशेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:52 IST

काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन : हंगाम सुरु होण्यापूर्वीच अनेकांनी केली विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कमी खर्चात आणि लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले होते. मात्र यावर्षी सोयाबीनचे दर कोसळले. त्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, सध्या ४ हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन पोहचले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे आता विकण्यासाठी सोयाबीनच नाही. अगदी काहीच शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरी ठेवले आहे.

सध्या शेती हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने उसंत घेतली असली तरी सध्या पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात फारसे उत्पादन झाले नाही. 

त्यातच भाव सुद्धा नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन कारावे लागले. त्यामुळे कापूस तसेच अन्य पिकांकडे शेतकरी वळले आहे. साधारणतः दिवाळीमध्ये सोयाबीन निघते. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांकडे पैशाची चणचण असते. त्यामुळे शेतकरी भाव मिळो, अथवा न मिळो गरज भागविण्यासाठी सोयाबीनची विक्री करतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीनच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे भाव वाढ झाली तरी त्याचा लाभ मात्र शेतकऱ्यांना नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

बाजारभाव काय? (₹)शेतमाल                               प्रतिक्विंटल भावसोयाबीन                                     ४३००हरभरा                                        ४७००तूर                                             १०,६००

तुरीचे भाव वाढलेमागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुरीचे दर वाढले आहे. तुरीला गेल्या वर्षी ७ ते ८ हजार प्रतिक्विंटल भाव होता. यावर्षी १० हजार ६०० रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे.

कोण काय म्हणतयकमी खर्चात लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यापेक्षा दुसरे पीक घेतलेले बरे. सध्या तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. त्यामुळे भाव वाढूनही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना काहीच नाही.-रोहन रामटेके

"चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पीक घेतल्या जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. एकीकडे भाव राहत नाही. दुसरीकडे बी- बियाणे, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. शेती कशी करावी हा प्रश्न आहे. "- रमेश खनके

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र