शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

सोयाबीनची आवक घटली; भाव चार हजार तीनशेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:52 IST

काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन : हंगाम सुरु होण्यापूर्वीच अनेकांनी केली विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कमी खर्चात आणि लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले होते. मात्र यावर्षी सोयाबीनचे दर कोसळले. त्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, सध्या ४ हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन पोहचले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे आता विकण्यासाठी सोयाबीनच नाही. अगदी काहीच शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरी ठेवले आहे.

सध्या शेती हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने उसंत घेतली असली तरी सध्या पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात फारसे उत्पादन झाले नाही. 

त्यातच भाव सुद्धा नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन कारावे लागले. त्यामुळे कापूस तसेच अन्य पिकांकडे शेतकरी वळले आहे. साधारणतः दिवाळीमध्ये सोयाबीन निघते. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांकडे पैशाची चणचण असते. त्यामुळे शेतकरी भाव मिळो, अथवा न मिळो गरज भागविण्यासाठी सोयाबीनची विक्री करतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीनच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे भाव वाढ झाली तरी त्याचा लाभ मात्र शेतकऱ्यांना नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

बाजारभाव काय? (₹)शेतमाल                               प्रतिक्विंटल भावसोयाबीन                                     ४३००हरभरा                                        ४७००तूर                                             १०,६००

तुरीचे भाव वाढलेमागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुरीचे दर वाढले आहे. तुरीला गेल्या वर्षी ७ ते ८ हजार प्रतिक्विंटल भाव होता. यावर्षी १० हजार ६०० रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे.

कोण काय म्हणतयकमी खर्चात लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यापेक्षा दुसरे पीक घेतलेले बरे. सध्या तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. त्यामुळे भाव वाढूनही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना काहीच नाही.-रोहन रामटेके

"चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पीक घेतल्या जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. एकीकडे भाव राहत नाही. दुसरीकडे बी- बियाणे, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. शेती कशी करावी हा प्रश्न आहे. "- रमेश खनके

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र