शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनची आवक घटली; भाव चार हजार तीनशेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 16:52 IST

काही मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन : हंगाम सुरु होण्यापूर्वीच अनेकांनी केली विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कमी खर्चात आणि लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनकडे बघितले जाते. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये शेतकरी सोयाबीन पेरणीकडे वळले होते. मात्र यावर्षी सोयाबीनचे दर कोसळले. त्यामुळे सोयाबीनचा पेरा कमी झाल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान, सध्या ४ हजार ३०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीन पोहचले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे आता विकण्यासाठी सोयाबीनच नाही. अगदी काहीच शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरी ठेवले आहे.

सध्या शेती हंगाम सुरु आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघायला मिळत आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने उसंत घेतली असली तरी सध्या पिकांना आवश्यकतेनुसार पाऊस कोसळला आहे. त्यामुळे शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, मागील काही वर्षांमध्ये सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीकडे दुर्लक्ष केले आहे. मागील वर्षात जिल्ह्यात फारसे उत्पादन झाले नाही. 

त्यातच भाव सुद्धा नसल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन कारावे लागले. त्यामुळे कापूस तसेच अन्य पिकांकडे शेतकरी वळले आहे. साधारणतः दिवाळीमध्ये सोयाबीन निघते. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांकडे पैशाची चणचण असते. त्यामुळे शेतकरी भाव मिळो, अथवा न मिळो गरज भागविण्यासाठी सोयाबीनची विक्री करतात. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी सोयाबीनच शिल्लक नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे भाव वाढ झाली तरी त्याचा लाभ मात्र शेतकऱ्यांना नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.

बाजारभाव काय? (₹)शेतमाल                               प्रतिक्विंटल भावसोयाबीन                                     ४३००हरभरा                                        ४७००तूर                                             १०,६००

तुरीचे भाव वाढलेमागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी तुरीचे दर वाढले आहे. तुरीला गेल्या वर्षी ७ ते ८ हजार प्रतिक्विंटल भाव होता. यावर्षी १० हजार ६०० रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे.

कोण काय म्हणतयकमी खर्चात लवकर निघणारे पीक म्हणून सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र भाव मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे त्यापेक्षा दुसरे पीक घेतलेले बरे. सध्या तर शेतकऱ्यांकडे सोयाबीन नाही. त्यामुळे भाव वाढूनही त्याचा उपयोग शेतकऱ्यांना काहीच नाही.-रोहन रामटेके

"चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, धान पीक घेतल्या जाते. मात्र सध्या शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. एकीकडे भाव राहत नाही. दुसरीकडे बी- बियाणे, रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. शेती कशी करावी हा प्रश्न आहे. "- रमेश खनके

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र