शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जिवती तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न तातडीने निकाली काढणार

By admin | Updated: February 22, 2015 01:01 IST

गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही.

जिवती : गेल्या अनेक वर्षापूर्वी मराठवाड्यातून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थायी झालेल्या नागरिकांना जमीन आहे; पण मालकी हक्क नाही. वास्तव्य आहे पण तीन पिढीचा पुरावा नाही, यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळग्रस्त निधीपासून वंचित राहावे लागत आहे तर विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या कागदपत्राअभावी शासकीय नोकरीत, स्पर्धेत भाग घेता येत नाही. अशा अनेक समस्याला तोंड देणाऱ्या समाजाचे प्रश्न तातडीने निकाली काढू, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री संजय राठोड यांनी जिवती येथे काल शुक्रवारी आयोजित सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमात बोलताना दिली.यावेळी ते पुढे म्हणाले, दिवसेंदिवस निसर्ग दगा असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यावर शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या मुलाबाळांना शिक्षणाकडे वळवावे. कारण शिक्षणामुळेच आपला विस्कटलेला समाज संघटित होईल व आपल्या समस्या सोडविण्यासाठी संघर्ष करेल. तेव्हाच आपल्या तांड्या-तांड्यात विस्कटलेल्या समाज घटकाचा विकास होईल. गेल्या अनेक वर्षापासून जमिनीचा मालकी हक्क व जातीचा दाखला, नॉनक्रिमीलेअरसाठी लावलेली जाचक अट लवकरच दूर व्हावी यासाठी त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊनच ते जिवतीतील सेवालाल महाराज जयंतीला उपस्थित झाले होते.सेवालाल महाराजांची २७६ वी जयंती जिवती येथील जुन्या ग्रामपंचायत समोरील रंगमंचकावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळचे नवलकुमार राठोड, जवाहर राठोड, बी.जी. राठोड उपस्थित होते. सेवालाल महाराजांच्या जयंतीची सुरुवात पायदळ व मोटार सायकल रॅली काढून करण्यात आली. त्यात आपली परंपरेने चालत आलेली गिते सादर करून समाजबांधवांनी लोकांची मने जिंकली. कार्यक्रमाप्रसंगी बालाजी हायस्कुल शाळेतील विद्यार्थिनींनी बंजारा गीतावर सामूहिक नृत्य सादर करून संस्कृतीचे दर्शन घडविले. सायंकाळी शाहीर दौलत राठोड यांनी वेगवेगळ्या भाषेत समाज प्रबोधनपर गिते गायली. प्रास्ताविक जी.व्ही. राठोड व आपल्या समाजाच्या व्यथा अमर राठोड यांनी मांडल्या. संचालन राजेश राठोड यांनी तर आभार गजानन राठोड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)