छायाचित्र
ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिचगाव-डोर्ली परिसरात बिबट्याचा संचार सुरू आहे. एक आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिक सायंकाळी घराबाहेर निघायला घाबरत आहेत. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्याची भाजप व नागरिकांनी वन अधिकारी मल्होत्रा यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
चिचगाव-डोर्ली परिसरात एकाच आठवड्यात बिबट्याने दोघांना ठार केले. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. शेतीची कामे ठप्प झाली. रात्री शेतीचे राखण करण्यासाठी शेतकºयांना अडचणी येत आहेत, याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी लक्ष वेधले. यावेळी भाजप जिल्हा महामंत्री व जि.प सदस्य क्रिष्णा सहारे, पंचायत समितीचे सभापती प्रा.रामलाल दोनाकडर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गोकुल बालपांडे, जिल्हा सचिव माणिक पाटील थेरकर, जि.प सदस्य दीपाली मेश्राम, पं. स सदस्य नीलकंठ मानापुरे, अरविंद नंदूरकर, माजी पं. स. सभापती रविंद्र मेश्राम, भाजयुमो शहर अध्यक्ष प्रा. सुयोग बाळबुधे, महामंत्री रितेश दशमवार, स्वप्नील अलगदेवे, पवन जयस्वाल, ललित उरकुडे, अक्षय चहांदे, लोमेश मेश्राम, विलास वाकुडकर, रेवनाथ ठाकरे, पुरूषोत्तम ठाकरे आदी उपस्थित होते.