शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अवैध दारूविक्रेतेच घडवू शकतात मालवणीची पुनरावृत्ती

By admin | Updated: June 25, 2015 01:15 IST

विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर : विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. परंतु, अवैध दारुविक्रेत्यांकडून विषारी दारुची विक्री करून चंद्रपुरातही मालवणीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारुमुक्ती अभियानाच्या संयोजिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली.मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा विषारी दारु प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, संपूर्ण राज्यात दारुबंदी करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू केली. दारुबंदी लागू करण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर शासनाने बंदी मागे घ्यावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा दारु असोसिएशनचे सल्लागार आणि त्या व्यवसायातील त्यांच्या साथीदारांनी जोरदार प्रयत्न करीत आहेत.मात्र, न्यायालयात आणि शासनदरबारी त्यांना अपयश आले. जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बनावट दारु दाखविली होती. तसेच अशाप्रकारच्या दारुचा पुरवठा होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या बनावट दारुमुळे नागरिकांना मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे कारण देत दारुबंदी हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.आता मालवणीच्या घटनेनंतर येथील दारुविक्रेते चंद्रपुरातही विषारी दारुचा पुरवठा करुन नागरिकांच्या जिवाशी खेळू शकतात. यात एखाद्याच्या मृत्यूनंतर ते शासनाने बंदी उठविण्याबाबत मागणी करु शकतात, असेही गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे. वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी काळात विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याची अजूनपर्यंत एकही घटना घडली नाही. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्रेते बनावट दारुमुळे नागरिकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करीत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. यासाठी भविष्यात दारु विक्रेते मोठे षडयंत्र घडवू शकतात. त्यामुळे पोलीस विभागाने याचे गांभीर्य लक्षाय घेता दारूची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)