शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अवैध दारूविक्रेतेच घडवू शकतात मालवणीची पुनरावृत्ती

By admin | Updated: June 25, 2015 01:15 IST

विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर : विषारी दारुमुळे मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी केली. परंतु, अवैध दारुविक्रेत्यांकडून विषारी दारुची विक्री करून चंद्रपुरातही मालवणीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारुमुक्ती अभियानाच्या संयोजिका अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली.मुंबईच्या मालवणी येथील १०२ नागरिकांचा विषारी दारु प्राशन केल्याने मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, संपूर्ण राज्यात दारुबंदी करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू केली. दारुबंदी लागू करण्यापूर्वी आणि प्रत्यक्षात अंमलात आल्यानंतर शासनाने बंदी मागे घ्यावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा दारु असोसिएशनचे सल्लागार आणि त्या व्यवसायातील त्यांच्या साथीदारांनी जोरदार प्रयत्न करीत आहेत.मात्र, न्यायालयात आणि शासनदरबारी त्यांना अपयश आले. जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बनावट दारु दाखविली होती. तसेच अशाप्रकारच्या दारुचा पुरवठा होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे जिल्ह्यात पुरवठा होणाऱ्या बनावट दारुमुळे नागरिकांना मृत्यू होण्याची शक्यता असल्याचे कारण देत दारुबंदी हटविण्याची मागणी त्यांनी केली होती.आता मालवणीच्या घटनेनंतर येथील दारुविक्रेते चंद्रपुरातही विषारी दारुचा पुरवठा करुन नागरिकांच्या जिवाशी खेळू शकतात. यात एखाद्याच्या मृत्यूनंतर ते शासनाने बंदी उठविण्याबाबत मागणी करु शकतात, असेही गोस्वामी यांनी निवेदनात म्हटले आहे. वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी काळात विषारी दारुमुळे मृत्यू झाल्याची अजूनपर्यंत एकही घटना घडली नाही. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारुविक्रेते बनावट दारुमुळे नागरिकांचा जीव जाण्याची भीती व्यक्त करीत आहेत. हा प्रकार गंभीर आहे. यासाठी भविष्यात दारु विक्रेते मोठे षडयंत्र घडवू शकतात. त्यामुळे पोलीस विभागाने याचे गांभीर्य लक्षाय घेता दारूची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे गोस्वामी यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)