शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

ग्रामीण जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 26, 2015 00:52 IST

शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे.

चंद्रपूर : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात जलस्रोतांनी तळ गाठला असून तळाचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जलजन्य आजार बळावण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नळ योजना असून अनेक गावात विहिरींवरून तसेच हातपंपावरून पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. बहुतांश ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली नाही. त्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत ही गावची प्रमुख संस्था असते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. ग्रामपंचायतीचा कारभार मुख्यत: सरपंच आणि ग्रामसेवक सांभाळत असतो. मात्र ग्रामसेवकाला विविध कामे असल्याने त्याला नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. परंतु जलशुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी तथा पाणी पुरवठा समितीवर असते. गावाला दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना घेणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणाच नाही. नळाद्वारे येणारे पाणी थेट नळ योजनेच्या विहिरीतून येते. कधीकधी ब्लिचिंग पावडर टाकले जाते. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पाण्याने तळ गाठला आहे. अशा स्थितीत पाण्यासोबत तळाला साचलेला गाळही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतो. या सर्व प्रकारामुळे जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे. (नगर प्रतिनिधी)