शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ग्रामीण जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: March 26, 2015 00:52 IST

शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे.

चंद्रपूर : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात जलस्रोतांनी तळ गाठला असून तळाचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जलजन्य आजार बळावण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नळ योजना असून अनेक गावात विहिरींवरून तसेच हातपंपावरून पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. बहुतांश ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली नाही. त्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत ही गावची प्रमुख संस्था असते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. ग्रामपंचायतीचा कारभार मुख्यत: सरपंच आणि ग्रामसेवक सांभाळत असतो. मात्र ग्रामसेवकाला विविध कामे असल्याने त्याला नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. परंतु जलशुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी तथा पाणी पुरवठा समितीवर असते. गावाला दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना घेणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणाच नाही. नळाद्वारे येणारे पाणी थेट नळ योजनेच्या विहिरीतून येते. कधीकधी ब्लिचिंग पावडर टाकले जाते. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पाण्याने तळ गाठला आहे. अशा स्थितीत पाण्यासोबत तळाला साचलेला गाळही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतो. या सर्व प्रकारामुळे जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे. (नगर प्रतिनिधी)