शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिजे

By admin | Updated: October 15, 2016 00:56 IST

पाकिस्तान आणि चीनची मैत्री आणि संपूर्ण जग दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहे.

श्रीपाल सबनीस : ६० वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळाब्रह्मपुरी : पाकिस्तान आणि चीनची मैत्री आणि संपूर्ण जग दहशतवादाच्या उंबरठ्यावर उभे आहे. जगाला युद्धापासून वाचवणारा एकमेव बुद्ध आहे. बौद्ध धम्म हा वास्तववादी आहे. नुसत्या काल्पनिक गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता. भारतालाच नव्हे तर सर्व जगाला सदाचार शिकविणारा पहिला महापुरुष भगवान बुद्ध होय. बौद्ध धर्म हाच जागतिक ऐक्याचा एकमेव अद्वितीय असा धर्म आहे. म्हणून युद्ध नको असेल तर बुद्ध पाहिेजे, असे मार्मिक विचार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात मुख्य अतिथी म्हणून व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंभोरा येथील बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. भदंत नंदवर्धन बोधी होते. प्रमुख वक्त्या म्हणून मराठा सेवा संघाच्या प्रवक्ता अ‍ॅड. वैशाली डोळस, ललिता सबनिस, सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके, दादाजी शेंडे, आसाराम बोदेले, शंकर मेश्राम व विजय रामटेके आदी उपस्थित होते. डॉ. सबनिस म्हणाले की, जगाचे कल्याण फक्त बुद्ध धम्मच करू शकेल. त्या धम्माचा आदी,मध्य व अंत सर्व गोड, हितकारक व कल्याणकारी असा आहे. सध्या सर्जिकल्स स्ट्राईक्सचे यश सरकार घेत आहे. पण हे यश लष्कराचे आहे. त्यामुळे राजकारणाला अहिंसाचा संबंध जोपासणे आवश्यक आहे. हुतात्म्यांना जातधर्म चिटकवू नका. तिसरे महायुद्ध थांबवायचे असेल तर बुद्ध पाहिजे, असे विचार मांडले. प्रमुख वक्त्या अ‍ॅड. डोळस यांनी ‘स्त्री आणि धम्म’ यावर विचार मांडताना म्हणाल्या की आजही स्त्रीचा माणूस म्हणून विचार होत नाही तर ती फक्त वस्तू म्हणून पाहिली जात आहे. धम्माने स्त्रीचा आदर त्या काळात केला. पण अजूनही समानता आली नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.भदंत नंदवर्धन बोधी यांनी ‘ब्राम्हणवाद व धम्म’, यातील फरक स्पष्ट करून ही लढाई धम्माच्या तत्वज्ञानानेच संपुष्टात येऊ शकते, असा उपदेश श्रोत्यांना अध्यक्षीय भाषणातून दिला आहे.कार्यक्रमाची सुरुवात समता सैनिक दलाच्या मानवंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ब्रह्मपुरी तालुक्यातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, आदर्श शिक्षक गुणवंत वैद्य व भीमराव ठवरे यांचा सपत्निक सत्कार तसेच पंचशील वस्तीगृहातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अशोक रामटेके, संचालन प्रा.डॉ.युवराज मेश्राम तर आभार दीपक सेमष्कर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, प्राचार्य जयराम खोब्रागडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, इंजिनिअर विजय मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.बी. रामटेके, डॉ.मिलिंद रंगारी, सुधीर अलोणे, जगदीश मेश्राम, सरिता खोब्रागडे, बौद्धरक्षक जांभूळकर, डेव्हीड शेंडे, प्रा.उज्वला रामटेके, डॉ. ई. एल. रामटेके, नरेंद्र बांते व अन्य समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)