शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पुतळा स्वच्छतेसाठी पैसे नसेल तर आम्ही देऊ

By admin | Updated: January 14, 2016 01:28 IST

ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे.

अवहेलना टाळा : शांताराम पोटदुखे यांचे आवाहनचंद्रपूर : ज्या मा.सा. कमन्नमवार यांनी चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रात मोठे केले, त्या नेत्याच्या पुतळ्याची अवहेलना बरी नव्हे. पुतळा स्वच्छ करण्यासाठी महानगर पालिकेकडे पैसा नसेल तर आम्ही देऊ, पण ही अवहेलना थांबवा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांनी केले आहे.शांताराम पोटदुखे हे अध्यक्ष असलेल्या लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने १६ जानेवारीला पुरस्कार दिले जात आहेत. यात कर्मवीर कन्नमवार पुरस्काराचाही समावेश आहे. एकीकडे कन्नमवार यांच्या नावाने पुरस्कार दिले जात असताना त्याच शहरातील कन्नमवारांचा पुतळा मात्र कचऱ्यात उभा असणे, हा विरोधाभास आहे. ‘लोकमत’मध्ये मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वृत्ताची दखल घेऊन शांताराम पोटदुखे यांनी आपली संवेदना आणि कळकळ व्यक्त केली. ते म्हणाले, हा पुतळा कुणी उभारला आणि कुणी स्वच्छ करावा हा वाद निरर्थक आहे. पुतळा जिल्हा परिषदेने उभारला असला तरी शहरातील पुतळ्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी महानगर पालिकेची असते. या पुतळ्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झाली अथवा नाही हे आपणास माहीत नाही, मात्र मनपा आपली जबाबदारी टाळू शकत नाही. त्यांच्याकडे पुतळा स्वच्छ करण्यासाठी माणसे आणि पैसा नसेल तर त्यांनी सांगावे, त्यासाठी आम्ही पैसा देऊ, असेही ते म्हणाले.