शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आता लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 15:17 IST

कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे.

ठळक मुद्देदुसऱ्यांदा चाचणी करण्याची गरज नाहीकोरोना रुग्णांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही. आरोग्य विभागाच्या या निर्णयाचा आधार घेत चंद्रपुरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापूर्वी सुटी देण्यात आली.कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये दहा दिवसात कुठलीही लक्षणे नसतील तर त्याची दुसरी चाचणी न करता थेट सुटी दिली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नव्या सूचनेनुसार याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात नव्या संशियातांसाठी जागा आणि चाचणीचा वेग वाढणार आहे.भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जायची.आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

सुटी झालेल्या रुग्णाकडून धोका नाहीरुग्णालयातून सुटी झालेला व्यक्ती दुसºयाला बाधित करू शकत नाही. मात्र, एखाद्या रुग्णाची प्रकृती स्थिर नसेल तर, त्याला सुटी द्यायची की नाही, याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेणार आहेत. लक्षणे गंभीर असतील तर अशा रुग्णाला कितीही कालावधीपर्यंत म्हणजेच तो पूर्णपणे बरा होईपर्यंत रुग्णालयात ठेवले जाणार आहे.आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसतील तर त्याला दहा दिवसात कोणतीही चाचणी न करता सुटी देण्यात येते. सुटी दिलेला रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त असतो. त्यामुळे लोकांनी सुटी झालेल्या रुग्णांना घाबरू नये. मात्र समाजात वावरताना सामाजिक अंतर पाळावे, जंतुनाशकाने हात धुवावे.-डॉ. कुणाल खेमनार,जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस