शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
विकसित भारताचा संकल्प निश्चितच पूर्ण होईल: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
3
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
4
कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने आयुष्य संपवले; दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री... चिठ्ठीत काय?
5
एकाच गावातील ३ तरुणी एकत्र गायब, पण तिघींची कहाणी वेगवेगळी; २४ तासांत पोलिसांनी काढले शोधून!
6
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
7
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
8
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
9
"माझी काय चूक?, उलट मी तिला वाचवलंय...", आधी पलाश मुच्छलसोबतचे 'ते' चॅट्स अन् आता कोरिओग्राफरचं नवं स्टेटस
10
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
11
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
12
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
13
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
14
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
15
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
16
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
17
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
18
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
19
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
20
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्व विभागाने देवटोकात उत्खनन केल्यास पुढे येईल समृद्ध इतिहास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:21 IST

राजेश मडावी चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी काठावरील देवटोक येथे नवीन मंदिराच्या बांधकामदरम्यान २५ मे २०२१ ...

राजेश मडावी

चंद्रपूर : सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनी काठावरील देवटोक येथे नवीन मंदिराच्या बांधकामदरम्यान २५ मे २०२१ रोजी पुरातन शिवपिंड आढळली. येथे पुन्हा काही वास्तू अथवा वस्तू आढळण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा. शास्त्रशुद्ध उत्खनन झाल्यास जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास उजेडात येऊ शकतो, असा दावा भारतीय संस्कृती निधीचे संयोजक व अभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना केला.

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या शिवलिंगाच्या पार्श्वभूमीवर देवटोक येथील शिवलिंगाची प्राचीनता आणि वेगळेपण कशात आहे, असे विचारल्यानंतर अशोकसिंह ठाकूर म्हणाले, देवटोकमध्ये आढळलेल्या शिवलिंगाचे देखणेपण नजरेत भरते. विदर्भात परमार राजवंशातील राजे जगदेव यांचे राज्य होते. या राजाचा कालखंड इ. स. १०९५ ते ११३४ पर्यंतचा आहे. जगदेवाच्या कार्यकाळात मार्कंडा देव येथील शिव मंदिरांचा समूह, ठाणेगाव येथील शिवमंदिर, भटाळा, जुगाद, सोंडो येथील मंदिर समूह, घंटा चौकी आणि गडचांदूर येथील मंदिरांचा समूह तसेच अन्य मंदिरेही उभारण्यात आली. जगदेव परमार हे शिवभक्त होते. त्यामुळे देवटोकातील शिवलिंगाच्या निर्मितीच्या ऐतिहासिकतेचा अनुबंध लक्षात येतो, याकडेही अभ्यासक ठाकूर यांनी लक्ष वेधले.

देवटोकातील शिवलिंग ११ ते १२ व्या शतकातील

देवटोक हे गाव वैनगंगा नदी काठावर वसले आहे. या नदी पलिकडील तीरावर मार्कंडा हे हेमांडपंथी देवस्थान प्रसिद्ध आहे. देवटोक म्हणजे मार्कण्डेय ऋषी यांचे वडील श्री मुरकेन्डेश्वर ऋषी यांचे स्थान असल्याची आख्यायिका असल्याचे विचारताच अशोकसिंह ठाकूर म्हणाले, देवटोक येथील शिवपिंडाचा संशोधकांनी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे देवटोक आणि मार्कडा देव येथील शिवलिंगात कमालीचे साम्य आहे. त्यामुळे हे शिवलिंग ११ ते १२ व्या शतकातील असावे, असा दावा अभ्यासक ठाकूर यांनी केला.

अन्यथा अनेक पिढ्यांचे नुकसान

जिल्ह्यात अनेक ठिकाणी जुन्या वास्तु, वस्तु, शिल्प, मंदिरे आणि अन्य साधने मिळत आहे. याबाबत काही दिवस चर्चा होते. मात्र हा वारसा जपण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून बेसिक प्रयत्न केले जात नाही, याबाबत विचारले असता अशोकसिंह ठाकूर म्हणाले, इतिहास विसरणे आणि नष्ट होणे हे काही एका पिढीचे नव्हे तर अनेक पिढ्यांचे आणि संपूर्ण मानवी विकासक्रमातील ऐतिहासिकताच गमावणे होय. असे कदापि घडू नये असे मत आहे.

ऐतिहासिक वारशाचे मूल्य ओळखावे

चंद्रपूर जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा जपण्याची आणि अधिक सखोल उत्खनन व संशोधन करून वर्तमानातील त्याचे महत्त्व सातत्याने नवीन पिढीसमोर अधोरेखित करण्याची गरज आहे. हे काही कुणा एकट्या संशोधकाचे काम नाही. त्यासाठी शासन, प्रशासन तसेच सर्व सजग नागरिकांनी या ऐतिहासिक वारशाचे मूल्य ओळखून दीर्घकालीन उपक्रमशील धोरण आखण्याची गरज आहे, असेही संशोधक ठाकूर यांनी यावेळी सांगितले.