शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

उपोषणकर्त्यांचे काही झाल्यास वेकोलि अधिकारी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:36 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण : ठाणेदारांचे वेकोलिला पत्रराजुरा: बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज चवथ्या दिवशीही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्याना काही झाल्यास व अनुचित प्रकार घडल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा आशयाचे पत्र ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिला पाठविले आहे.बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा, सास्ती, भंडागपूर, कोलगाव, मानोली या क्षेत्रातील शेतीवर सर्व प्रकारचे सेक्शन लावूनसुद्धा शेतकऱ्यांना नोकरी आणि शेतीचा मोबदला देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करुन शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. वारंवार वेकोलि प्रशासनाला निवेदन देऊनही पाच वर्षापासून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्यांना विरोधात विना घटे (२९), राजू मोहारे (३१) सोनु गाडगे (३०), बाळू जुलमे (३२) बालाजी पिंपळकर (३१), रविंद्र बोबडे (३५), पुष्पा बुधवारे (५८) मुर्लीधर फटाले (५०) हे आमरण उपोषणाला बसले असून तीन दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ २०० महिला -पुरुष आंदोलनात सहभागी झाले आहे.आमरण उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिचे उप-महाप्रबंधक एम. एलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले यांना दिले. (शहर प्रतिनिधी)पाच तास मिटिंग; मात्र निर्णय नाहीराजुरा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. एम. दयानिधी यांच्या दालनात पाच तास मिटिंग झाली. या मिटींगला राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जन इंगळे, वेकोलिचे उपमहाप्रबंधक एम. येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी विजय चन्ने, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, लोकमतचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, प्रविण देशकर उपस्थित होते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे मार्ग निघू शकला नाही. सर्व अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी एम. दयानिधी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर अन्याय होत असून वेळीच दखल घ्या, वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचरण करा, उपोषणकर्त्याला काही झाल्यास वेकोलिचे अधिकारी जबाबदार राहील.चवथ्या दिवशीही उपोषण सुरुच उपोषणाच्या चवथ्या दिवशीसुद्धा आमरण उपोषण सुरुच आहे. ८७१ हेक्टर जमीन वेकोलिने घेतल्या. एक हजार ८० नोकऱ्या व त्यावर आधारित पाच हजार नागरिकांचा प्रश्न असून अधिकारी तळमळीने मदत करीत आहे. मात्र वेकोलिचे अधिकारी मात्र सुस्त दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलण्याची मुभा नाही. कोळसा मंत्रालयाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांवर मरण्याची पाळी येत असल्याचा संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.