शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

उपोषणकर्त्यांचे काही झाल्यास वेकोलि अधिकारी जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2017 00:36 IST

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पग्रस्तांचे उपोषण : ठाणेदारांचे वेकोलिला पत्रराजुरा: बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्र्रस्तांनी वेकोलिच्या धोरणाविरोधात येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज चवथ्या दिवशीही उपोषण सुरूच असून उपोषणकर्त्याना काही झाल्यास व अनुचित प्रकार घडल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा आशयाचे पत्र ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिला पाठविले आहे.बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा, सास्ती, भंडागपूर, कोलगाव, मानोली या क्षेत्रातील शेतीवर सर्व प्रकारचे सेक्शन लावूनसुद्धा शेतकऱ्यांना नोकरी आणि शेतीचा मोबदला देण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई करुन शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू आहे. वारंवार वेकोलि प्रशासनाला निवेदन देऊनही पाच वर्षापासून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्यांना विरोधात विना घटे (२९), राजू मोहारे (३१) सोनु गाडगे (३०), बाळू जुलमे (३२) बालाजी पिंपळकर (३१), रविंद्र बोबडे (३५), पुष्पा बुधवारे (५८) मुर्लीधर फटाले (५०) हे आमरण उपोषणाला बसले असून तीन दिवसापासून अन्न त्याग आंदोलन करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ २०० महिला -पुरुष आंदोलनात सहभागी झाले आहे.आमरण उपोषणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास वेकोलिच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे पत्र राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे यांनी वेकोलिचे उप-महाप्रबंधक एम. एलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले यांना दिले. (शहर प्रतिनिधी)पाच तास मिटिंग; मात्र निर्णय नाहीराजुरा येथील उपविभागीय अधिकारी डॉ. एम. दयानिधी यांच्या दालनात पाच तास मिटिंग झाली. या मिटींगला राजुराचे तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुराचे ठाणेदार मल्लीकार्जन इंगळे, वेकोलिचे उपमहाप्रबंधक एम. येलय्या, नियोजन अधिकारी मनोज नवले, प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी विजय चन्ने, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. बी. यू. बोर्डेवार, लोकमतचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, प्रविण देशकर उपस्थित होते. वेकोलिच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे मार्ग निघू शकला नाही. सर्व अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी एम. दयानिधी यांनी वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांवर अन्याय होत असून वेळीच दखल घ्या, वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचरण करा, उपोषणकर्त्याला काही झाल्यास वेकोलिचे अधिकारी जबाबदार राहील.चवथ्या दिवशीही उपोषण सुरुच उपोषणाच्या चवथ्या दिवशीसुद्धा आमरण उपोषण सुरुच आहे. ८७१ हेक्टर जमीन वेकोलिने घेतल्या. एक हजार ८० नोकऱ्या व त्यावर आधारित पाच हजार नागरिकांचा प्रश्न असून अधिकारी तळमळीने मदत करीत आहे. मात्र वेकोलिचे अधिकारी मात्र सुस्त दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलण्याची मुभा नाही. कोळसा मंत्रालयाच्या कार्यप्रणालीमुळे शेतकऱ्यांवर मरण्याची पाळी येत असल्याचा संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.