शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

पणन महासंघाला मुहूर्त सापडेना

By admin | Updated: November 9, 2016 01:59 IST

दिवाळी झाली तरी महाराष्ट्र राज्य पणन सहकारी महासंघाला कापूस खरेदी सुरू करण्यास मुहूर्त सापडलेला नाही.

सीसीआय कोमात : भद्रावतीत कापसाला सर्वाधिक भावचंद्रपूर : दिवाळी झाली तरी महाराष्ट्र राज्य पणन सहकारी महासंघाला कापूस खरेदी सुरू करण्यास मुहूर्त सापडलेला नाही. केंद्र सरकारच्या सीसीआयनेदेखील अद्याप खरेदी सुरू केलेली नाही. परिणामी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले असून सध्या खेडा खरेदी जोरात सुरू आहे. पणन महासंघाच्या केंद्रावर हमी भावाला खरेदी सुरू करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावामध्ये कापसाची विक्री सुरू केली आहे. जिल्ह्यात भद्रावती बाजार समिती अंर्तगत येणाऱ्या मुर्सा येथे सर्वाधिक भावावर कापूस खरेदी केली जात आहे. जिल्ह्यात कापूस पट्टा असलेल्या कोरपना, टेमुर्डा, महाकुर्ला येथे अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यात वरोरा, राजुरा, भद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे कापूस खरेदी सुरू केली आहे. जिनिंग-प्रसिंग कंपन्यांमध्ये ही खरेदी दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आली आहे. यावेळी संबंधित बाजार समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सर्वाधिक ४ हजार ७०० रुपये भाव भद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे देण्यात येत असून त्या खालोखाल वरोरा तालुक्यात भाव देण्यात येत आहे. मात्र, हे दरदेखील दररोज चढउतार होत आहेत. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विक्रीला काढलेला नाही. कापसाला भाव मिळतील, तेव्हा खऱ्या अर्थाने कापूस खरेदी सुरू होईल. तोपर्यंत लहान व्यापारी गावागावात जाऊन खेडा खरेदी करीत आहेत.यावर्षी कापूस उशिरा हातात आला. त्यामुळे दिवाळीपूर्वी कापसाचे पैसे मिळाले नाहीत. दिवाळी झाल्यानंतरही पणन महासंघाने कापूस खरेदीची घोषणा केलेली नाही. केंद्र शासनाचे सीसीआय कापूस खरेदी सुरू करीत असते. परंतु सीसीआयनेदेखील अद्याप खरेदी केंद्र उघडलेले नाही. शासकीय खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला किंमत राहिलेली नाही. पणन महासंघाने खरेदी सुरू केली तर व्यापारी स्पर्धात्मक अधिक किंमतीला कापूस घेत असतात. यावर्षी ती परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला आहे.आधीच पावसाच्या अनिमिततेमुळे कापसाचे पीक उशिरा आले. परतीच्या पावसानंतर पिकांवर रोगराई पसरली होती. त्यात पुन्हा शेतकऱ्यांचे पैसे खर्च झाले. एकीकडे कापसाला भाव नाही, दुसरीकडे कापूस वेचणीकरिता मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मजुरांचे भाव वाढले आहेत. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे. (प्रतिनिधी)भावात तफावतभद्रावती तालुक्यातील मुर्सा येथे ४ हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाला भाव दिला जात आहे. त्याच वेळी पणन महासंघ किंवा आयसीसीची खरेदी सुरू झाली असती तर हा भाव पाच हजार रुपयांपेक्षा अधिक राहिला असता. व्यापाऱ्यांच्या खरेदीमध्ये राजुरा येथे ४ हजार ७०० रुपये तर वरोरा तालुक्यातील माढेली येथे ४ हजार ७०० ते ४ हजार ७०७ रुपये भाव देण्यात येत आहे. चंद्रपुरातही तोच भाव आहे. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातही भावात फार तेजी नाही. व्यापारी भाव पाडून कापूस मागत असल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.कोरपन्यात खरेदी कधी?१९८३ पासून कोपरन्यात कापूस खरेदी केली जाते. या भागात सहा जिनिंग-प्रेसिंग उद्योग आहेत. तालुक्यातील टेमुर्डा, महाकुर्ला, चनई (खु.), आशापुरा, सोनुर्ली, नारंडा येथेही कापूस खरेदी होत असते. परंतु यावर्षी व्यापाऱ्यांनी अद्याप खरेदी केलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून खासगी खरेदी बंद आहे. गेल्या वर्षी सीसीआयने खरेदी सुरू केल्यावर चांगला प्रतिसाद मिळाला होता.