शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची भूक आश्वासनावरच विझली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.

ठळक मुद्देऑटोचालकांची व्यथा : हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे बेहाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दीड महिन्यांपासून ऑटोची चाके थांबली आणि हातावर आणून पानावर खाणाºया जिल्ह्यातील आठ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ आली. कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यामुळे सरकार, प्रशासन एवढेच नाही, तर लोकप्रतिनिधींकडे मदतीची याचना केली. मात्र त्यांच्या पदरी आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या ऑटोचालकांसमोर आहे.जिल्ह्यात आठ हजाराच्या जवळपास ऑटोचालक असून त्यांच्या भरोश्यावर कुटुंबातील किमान ३० हजार व्यक्तींचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. हातावर आणून पानावर खाणाऱ्या या ऑटोचालकांना दररोज सरासरी ४०० ते ५०० रुपये मिळायचे. मात्र दीड महिन्यांपासून ऑटोची चाके बंद झाली आणि भविष्यांची चिंता त्यांना सतावू लागली.दरम्यान, शासन स्तरावर मदत मिळावी, यासाठी त्यांनी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले. मात्र उपयोग झाला नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेत जीवनावश्यक साहित्याची किट देण्याची मागणी केली.त्यांनी ऑटोचालकांनी किट देण्याचे मान्य केले. यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले. ऑटोचालकांनी तत्परतेने अर्जही दाखल केले. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.प्रशासनाकडून मदत नाहीलॉकडाऊनच्या काळातही एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी ऑटो चालक धाऊन येत आहे. मात्र त्यांच्या मागे प्रशासनाचा ससेमिरा लागत आहे. एखाद्या गावावरून रुग्णाला घेऊन आल्यानंतर परत जाताना त्या ऑटोचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर पेट्रोलपंपावर पेट्रोल मागूनही दिले जात नसल्याने त्यांची अडचण होत आहे.या आहेत संघटनामहाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनाविदर्भ कामगार ऑटोरिक्षा चालक संघटनाभिमशक्ती ऑटो चालक संघटनामागील दीड महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे व्यवसाय पूर्णत: बुडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी.- अशोक बुटले, पठाणपुरा

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षा