शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
3
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
4
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
5
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
6
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
7
वृश्चिक राशीसाठी नवीन वर्ष 2026: आव्हानांमधून प्रगतीची 'आशा'; परिश्रमात सातत्य ठेवल्यास होणार नाही निराशा 
8
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
9
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
10
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
11
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
12
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
13
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
14
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
15
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
16
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
17
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
18
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
20
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
Daily Top 2Weekly Top 5

मालधक्क्यावर शेकडो टन खत भिजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:51 IST

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही.

ठळक मुद्देचंद्रपुुरातील प्रकार : ट्रकच्या रांगा, सावरण्याआधीच मुसळधार पावसाची हजेरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खताचे वितरण मंजूर झाले असून युरिया (इफ्को) खताची रविवारी चंद्रपूरच्या मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगन आली. येथील मालधक्यावर उतरलेले खत जिल्हाभरात ट्रकद्वारे पोहोचविले जाणार होते. मात्र मालगाडीतून खत खाली उतवून ठेवताच ते खत ट्रकमध्ये भरण्याआधीच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाहतूकदारांनाही खतावर झाकण्याची संधी मिळाली नाही. परिणामी शेकडो टन खत पावसाच्या पाण्याने भिजल्याचा प्रकार रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंद्रपूरच्या मालधक्क्यावर घडला.रविवारी सकाळपासूनच वातावरण कोरडे असल्याने पावसाची कोणतीही शक्यता नव्हती. त्यामुळे मालगाडीने आलेला खत जमिनीवर उतवून ठेवण्यात आला. काही वाहतूकदारांनी खत ट्रकांमध्ये लोड केले. मात्र दुपारी १ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उघड्यावर असलेल्या शेकडो टन खतावर झाकणे शक्य झाले नाही. परिणामी शेकडो टन खत पाण्याने भिजला.‘लोकमत’ने दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रत्यक्ष पाहणी केली असता, खत असलेल्या जागेवर पाणी साचल्याने आढळून आले. काही ढिगांवर झाकण्यात आले होते. तर माल लोड करण्यासाठी ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या.मालधक्यावर उतरलेला माल साठवून ठेवण्यासाठी शेडची व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडल्याची माहिती खत वाहतूक करणाºया ट्रकचालकांनी दिली.मालधक्क्यावर असुविधाचंद्रपूर येथील मालधक्क्यावर नेहमीच खत, धान्य व इतर वस्तू उतरविल्या जातात. मात्र उतरवलेला माल साठवणूक करण्यासाठी शेड नसल्याने लगेच मालाची उचल करावी लागते. याच मालधक्क्यावर रेल्वे व्हॅगनने आलेला माल गडचिरोली जिल्ह्यातही पोहचविला जाते. त्यामुळे येथे माल साठवणुकीसाठी शेडची नितांत गरज आहे. मात्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध नसल्याने दरवर्षीच येथे उतरविलेला माल पावसाच्या पाण्यात भिजत असते. या मालधक्यावर कच्चा रस्ता असल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. परिणामी ट्रक चालकांनाही मोठी कसरत करावी लागते.खत विरघळणारशेतपिकांना युरिया खत अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही पिकाची लागवड करणारा शेतकरी युरिया खताची मागणी करतो. युरिया खत पाणी लागल्यास सर्वात कमी वेळात विरघळणारा खत आहे. पावसाने भिजलेला खत आता शेतकºयांच्या माथी मारला जाणार असून ५० किलोची बॅग आता कमी वजनाची भरणार आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होणार आहे. मात्र खताची गरज व पाण्याने खत भिजल्याची माहिती शेतकºयांना नसल्याने कृषी केंद्रात पुरवठा केला जाणार कमी वजनाचा हा खत बिनदिक्कत विकला जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी