शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

रोजगाराअभावी शेकडो मजुरांचे आंध्र व तेलंगणात स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:13 IST

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प : मिरची तोडण्यासाठी मजुरांना मागणी

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यातील शेतीचा हंगाम संपुष्टात आल्याने शेतमजुरांच्या हाताला कामाची गरज आहे. मात्र, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू नसल्याने मजुरांना रोजगाराच्या शोधार्थ आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्थलांतर करावे लागत आहे.

मूल तालुका धान उत्पादक म्हणून ओळखला जातो. शेती हंगाम संपल्यावर मजुरांच्या हाताला काम नाही. तालुक्यात रोजगाराचे दुसरे साधन नाही. त्यामुळे मजूर रोजगारासाठी परराज्यांत जाणे पसंत करीत आहेत. लगतच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, त्या प्रमाणात तिथे मजूर मिळत नाहीत, महाराष्ट्रातील मजूर मोठ्या प्रमाणावर मिरची तोडण्यासाठी स्थलांतरित होत आहेत. सुमारास तीन-चार महिन्यांसाठी मजूर परराज्यांत स्थलांतरित होतात. राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बहुतांश अधिकारी व व्यस्त होते. परिणामी, रोजगार हमी योजनेच्या कामांना प्रशासकीय मान्यतेला विलंब झाला. कामांचा कार्यारंभ आदेश जारी झाला नाही. रोजगार हमी योजनेची कामे तालुक्यात सध्या कुठेही सुरू नाहीत.

मागील वर्षी अशी झाली कामे मूल पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने तालुक्यात ४५ गावांमध्ये कामे सुरू आहेत. यात हळदी, भेजगाव, चांदापूर, फिस्कुटी, मारोडा, नांदगाव, गोवर्धन, डोंगरगाव, जाणाळा, भगवानपूर, चिरोली आदी गावांत अमृतसरोवर, मामा तलाव, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड, गुरांचा गोठा, पांदण रस्ता तर चिचाळा, सुशी, खालवसपेट, मरेगाव आदी गावांत क्रीडांगणाच्या कामावर मजुरांना रोजगार मिळाला आहे.

सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकटकामेच सुरू झाले नसल्याने गावातील मजूर कामाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारीचे संकट निर्माण झाले. रोजगार हमी योजनेच्या कामांनी मजुरांना मोठा आधार मिळतो. यामुळे गावात राहून रोजगार उपलब्ध होत असल्याने मजूरही समाधान व्यक्त करतात. असे असताना कामे सुरूच झाले नसल्याने मजुरांवर बेरोजगारीचे सावट कायम आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणUnemploymentबेरोजगारीchandrapur-acचंद्रपूर