लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरला. मात्र, या महापुरामुळे मातीची शेकडो घरे जमीनदोस्त झाले. पूरग्रस्त गावांमध्ये भटकंती केल्यास सर्वत्र घरांचे भग्नावशेष दिसून येतात. शासकीय यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त असला तरी मदत केव्हा मिळणार, घरे कशी उभारणार, या प्रश्नाने गावकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते. वैनगंगा नदीपासून बऱ्याच अंतरावर असलेली घरीही पुराच्या पाण्याने कवेत घेतली. लाडज, बेलगाव, किन्ही, पारडगाव, बेटाळा, पिंपळगाव (भो.) रणमोचन परिरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते.भोजन मिळाले पण भविष्य अंधारातपूरपीडित नागरिकांना शासन व सामाजिक संस्थांकडून काही प्रमाणात मदत सुरू झाली. नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुरामुळे घरे कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आहेत. कष्टाने उभारलेले घर पुरात वाहून गेले. जेवण मिळाले पण घरांची उभारणी कशी करायची, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.जनावरांसाठी एक टन चारा उपलब्धमहापुराने सर्व पिके पाण्याखाली आल्याने कुजून गेली. जनावरांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाकडून एक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनात बोटीच्या साह्याने लाडज येथे चारा पोहचविण्यात आला आहे. पूरग्रस्त गावांची माहिती गोळा करून चारा पुरविण्याचे काम सुरू झाले आहे.केंद्रीय पथक करणार पूरग्रस्त भागाची पाहणीचंद्रपूर : मध्य प्रदेशातील संजय सरोवर व गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले. प्केंद्रीय मंत्रालयीन पथक शुक्रवारी व पूरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहे. दुपारी ४ वाजता ब्रह्मपुरी येथील शासकीय विश्रामगृहात पथकाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजता बेलगाव, बेटाळा, सायंकाळी ५.३० वाजता किन्ही, सायंकाळी ५.४५ वाजता गांगलवाडी व बरडकिन्ही येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर हे पथक सायंकाळी ६.१५ वाजता गडचिरोलीकडे रवाना होणार आहे.
महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST
तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते.
महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त
ठळक मुद्देगावकरी मदतीच्या प्रतीक्षेत : सहा गावातील घरांचे सर्वाधिक नुकसान