शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

महापुरामुळे शेकडो घरे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते.

ठळक मुद्देगावकरी मदतीच्या प्रतीक्षेत : सहा गावातील घरांचे सर्वाधिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वैनगंगा नदीला आलेला पूर ओसरला. मात्र, या महापुरामुळे मातीची शेकडो घरे जमीनदोस्त झाले. पूरग्रस्त गावांमध्ये भटकंती केल्यास सर्वत्र घरांचे भग्नावशेष दिसून येतात. शासकीय यंत्रणा नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त असला तरी मदत केव्हा मिळणार, घरे कशी उभारणार, या प्रश्नाने गावकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.तालुक्यातील लाडज, बेलगाव, किन्ही, बेटाळा, पारडगाव, रणमोचन या गावांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रत्यक्ष पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन पुराची माहिती घेतली असता धक्कादायक चित्र समोर आले. पुराच्या काळात वरून दिसणारे दृश्ये वरवर होते. वैनगंगा नदीपासून बऱ्याच अंतरावर असलेली घरीही पुराच्या पाण्याने कवेत घेतली. लाडज, बेलगाव, किन्ही, पारडगाव, बेटाळा, पिंपळगाव (भो.) रणमोचन परिरात पुराच्या पाण्याने थैमान घातले होते.भोजन मिळाले पण भविष्य अंधारातपूरपीडित नागरिकांना शासन व सामाजिक संस्थांकडून काही प्रमाणात मदत सुरू झाली. नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुरामुळे घरे कोसळल्याने निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आहेत. कष्टाने उभारलेले घर पुरात वाहून गेले. जेवण मिळाले पण घरांची उभारणी कशी करायची, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.जनावरांसाठी एक टन चारा उपलब्धमहापुराने सर्व पिके पाण्याखाली आल्याने कुजून गेली. जनावरांची उपासमार होऊ नये, यासाठी शासनाकडून एक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे व तहसीलदार विजय पवार यांच्या मार्गदर्शनात बोटीच्या साह्याने लाडज येथे चारा पोहचविण्यात आला आहे. पूरग्रस्त गावांची माहिती गोळा करून चारा पुरविण्याचे काम सुरू झाले आहे.केंद्रीय पथक करणार पूरग्रस्त भागाची पाहणीचंद्रपूर : मध्य प्रदेशातील संजय सरोवर व गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नुकसान झाले. प्केंद्रीय मंत्रालयीन पथक शुक्रवारी व पूरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहे. दुपारी ४ वाजता ब्रह्मपुरी येथील शासकीय विश्रामगृहात पथकाचे आगमन होणार आहे. त्यानंतर दुपारी ४.१५ वाजता बेलगाव, बेटाळा, सायंकाळी ५.३० वाजता किन्ही, सायंकाळी ५.४५ वाजता गांगलवाडी व बरडकिन्ही येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर हे पथक सायंकाळी ६.१५ वाजता गडचिरोलीकडे रवाना होणार आहे.

टॅग्स :floodपूर